शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:13 IST

मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली.

ठळक मुद्दे‘सीएम’चे आश्वासन हवेतच : दोन वर्षे लोटली, मदत नाही

नरेंद्र नप्ते ।ऑनलाईन लोकमतमुडाणा : मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली. त्यात आता यंदा गारपीट आणि वादळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.अडीच वर्षांपूर्वी ४ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मदन येरावार आदींनी महागाव तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. नंतर सर्वेक्षण झाले. मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या नावाने ओरडत आहे.यावर्षी चार दिवस महागाव तालुक्याला अवकाळी व वादळी पावसाने झोडपले. गारपिटीने तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रबीतील गहू, हरभरा, भाजीपाला पिकासह फळांचे मोठे नुकसान झाले. राजुरा, बिजुरा, वडद, कोठारी, मुडाणा, काळी टेंभी, चिल्ली, पिंपळगाव, तिवरंग आदी गावांना तडाखा बसला. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.शासनासोबतच अस्माी संकटाने शेतकरी हादरून गेले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांचे अर्थकारण बिघडले आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.सरकारविरूद्ध रोषसरकार केवळ फोटो सेशन करण्यापुरतेच मदतीची घोषणा करते. प्रत्यक्षात मदत दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरूद्ध प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये वाघ असल्याचे सांगितले जाते. मात्र शेतकरी उपेक्षित असल्याची प्रतिक्रिया जगदीश नरवाडे, उपसरपंच वसंतराव राठोड, संदीप खराटे आदींनी व्यक्त केली.पहिल्यांदा २ मार्च २०१५ रोजी गारपीट झाली. त्याचा अद्याप मोबदला मिळाला नाही. आताही मायबाप सरकारकडून कोणताच लाभ मिळण्याची शक्यता नाही. या सरकारच्या काळात नुकसान भरपाई मिळणार नाही.- विष्णू गांवडेशेतकरी