शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघाडणी

By admin | Updated: January 1, 2016 03:49 IST

जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय

यवतमाळ : जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना विचारली. या अधिकाऱ्यांनी अशी योजना माहिती नसल्याचे उत्तर दिले. यावरून ना. अहीर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सभेत ग्रामीण पाणीपुरवठा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, रोजगार हमी योजना, कृषी विभागाच्या योजना यांचा सखोल आढावा घेण्यात आला. दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत विषयानुरुप आढावा घेतला जात असताना अधिकाऱ्यांकडून चक्क खोटी माहिती दिली जात होती. भाजपा आमदारांकडून या अधिकाऱ्यांची पोलखोल करण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार मदन येरावार उपस्थित होते. इंदिरा गांधी विकलांग योजना काय आहे, याची विचारणा ना.अहीर यांनी समाज कल्याण अधिकाऱ्याकडे केली. त्यांनी अशी कोणतीच योजना माहीत नसल्याचे सांगितले. जिल्ह्यात या योजनेतून केवळ २५७ अपंग, मतिमंद यांना लाभ दिला जातो. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अपंग व मतिमंदाचा आकडा फार मोठा आहे. तसेच या योजनेतून सिकलसेल ग्रस्तांनाही लाभ देण्याची सोय आहे. असे असतानाही त्याचा लाभ दिला जात नाही. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील ४० टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांची यादी तहसीलदारांकडे सादर करावी, सिकलसेल रुग्णांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने द्यावी, असे निर्देश दिले. या याद्या मिळताच इंदिरा गांधी विकलांग योजनेचा किती जणांना लाभ देता येतो त्यासाठी तहसीलदारांनी प्रयत्न करावे, असे सांगण्यात आले. अधिकारी वर्ग अपंग व मतिमंदांच्या योजना राबविण्यातही कुचराई करीत असल्याचे या बैठकीत उघड झाले. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या निधीअभावी रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील आमदारांनी निधी देण्याची तयारी दर्शविली. तशा योजनांची यादीच आमदारांकडे सादर करण्याचे निर्देश जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आर्णी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कंत्राटदाराने तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली. याबाबत आमदार राजू तोडसाम यांनी विचारणा केली. यावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सदर प्रकरणात कंत्राटदाराने मंत्र्याकडे तक्रार केली. मंत्र्यांनी केलेल्या सूचनेवरून काम थांबविण्यात आल्याचे सांगितले. या आक्षेपावर अहवाल तयार करून मंत्र्यांकडे त्वरित पाठवावा, असे निर्देश देण्यात आले. सिकलसेल रुग्णांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)रंगरंगोटी व टाईल्ससाठी नळयोजना बंद४महागाव येथील नळ योजनेचे काम पूर्ण झाले असून ती का बंद आहे, अशी विचारणा आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली. यावर जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याने अतिशय चिड आणणारे उत्तर दिले. रंगरंगोटी व टाईल्स बसविण्याचे काम थांबल्यामुळे योजना वर्षभरापासून बंद असल्याचे सांगितले. सुरुवातीला ही योजना सुरू असल्याचे उत्तर देत अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार नजरधने यांनी तुम्ही येथे भेट दिली काय असे विचारताच त्यांनी नुकताच प्रभार आल्याचे ठेवणीतील उत्तर समितीपुढे दिले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सर्वांनीच धारेवर धरले.