शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन काळे ठिक्कर, कापसाची बोंडे सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

अगदी हाती येणारे पीक पावसाने मातीमोल केले. अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच ओला झाला असून सोयाबीनदेखील काळे पडल्याने उत्पन्नात फार मोठी घट येण्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरीप हंगामाची सोय केली. यंदा चांगले उत्पादन होईल, असा अंदाज होता. शेतकऱ्यांनाही तीच आशा होती. पिकाची अवस्था अतिशय चांगली होती. मात्र नियतीला ते पाहावले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळ्या ठिक्कर पडल्या आहेत, तर कापसाची बोंडेदेखील सडून गेली आहेत. हातात येणारे पीक डोळ्यासमोर मातीमोल झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. वणी तालुक्यात या पावसामुळे पिकांचे नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. वणी उपविभागातील वणीसह मारेगाव या दोन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात कापूस फुटून होता, तर सोयाबीन कापणीवर आले होते. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून त्याच्या गंज्या शेतात उभ्या केल्या होत्या. अशातच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आणि शेतकरी हादरून गेला. अगदी हाती येणारे पीक पावसाने मातीमोल केले. अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच ओला झाला असून सोयाबीनदेखील काळे पडल्याने उत्पन्नात फार मोठी घट येण्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरीप हंगामाची सोय केली. यंदा चांगले उत्पादन होईल, असा अंदाज होता. शेतकऱ्यांनाही तीच आशा होती. पिकाची अवस्था अतिशय चांगली होती. मात्र नियतीला ते पाहावले नाही. या भागात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. २० सप्टेंबरच्या रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. २१ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. अनेक शेतांमधील पिकात अजूनही पाण्याचे डबके साचून आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य आजाराचे आक्रमण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अर्ली व्हरायटीची बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. दोन वर्षांपूर्वी ऐन पिके काढणीवर असताना वणी तालुक्यात असाच पाऊस झाला. त्यावेळीदेखील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. यंदा त्याहीपेक्षा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी निसर्गाच्या प्रकोपात सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागातर्फे पंचनामे केले जातात. मात्र नुकसान लाखोत असले तरी मदत मात्र पाच ते १० हजारांची दिली जाते. निसर्गाच्या या चक्रात शेतकरी सातत्याने भरडला जात आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही, दुसरीकडे निसर्गाच्या प्रकोपात पिकांची माती होते. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. यावर्षी पिकांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले, तेवढा मोबदला सरकारने द्यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

औंदाही पावसानं चांगलीच सोय लावली जी...! - कापूस, सोयाबीन पिकाची स्थिती चांगली होती. मात्र परतीच्या पावसानं पिकाची चांगलीच सोय लावली जी...! आता आम्हा शेतकऱ्यांनी जगाचं तरी कसं, असा केविलवाणा प्रश्न मांगरूळ येथील शेतकरी प्रभाकर डाखरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

 

टॅग्स :agricultureशेती