शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

सोयाबीनचा दगा, दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 16, 2014 23:31 IST

सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे

पुसद : सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे सोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. कपाशी हे तोट्याचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कास धरली. मात्र यंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. सोयाबीन पीक ऐन भरात आले असतानाच पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. अनेक शेतात तर शेगांमध्ये दाणेच तयार झाले नसल्याचे दिसून आले. सोंगणी आणि काढणीचा खर्च मोठा आहे. सोंगणी आणि काढणीचा खर्चही होणाऱ्या उत्पन्नातून निघणे कठीण आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्या ऐवजी त्यात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी शेतकऱ्यांची दिवाळी सोयाबीन पिकाच्या भरवशावर साजरी होत असते. मात्र सोयाबीन पीकच हातून गेल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन नुकसानीची पाहणी करावी तसेच सर्वे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)