शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

सोयाबीनचा दगा, दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 16, 2014 23:31 IST

सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे

पुसद : सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे सोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. कपाशी हे तोट्याचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कास धरली. मात्र यंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. सोयाबीन पीक ऐन भरात आले असतानाच पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. अनेक शेतात तर शेगांमध्ये दाणेच तयार झाले नसल्याचे दिसून आले. सोंगणी आणि काढणीचा खर्च मोठा आहे. सोंगणी आणि काढणीचा खर्चही होणाऱ्या उत्पन्नातून निघणे कठीण आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्या ऐवजी त्यात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी शेतकऱ्यांची दिवाळी सोयाबीन पिकाच्या भरवशावर साजरी होत असते. मात्र सोयाबीन पीकच हातून गेल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन नुकसानीची पाहणी करावी तसेच सर्वे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)