शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

सोयाबीनचे उत्पादन १२ लाख क्विंटलने घटले

By admin | Updated: December 13, 2014 22:46 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या नगदी पिकाचे उत्पादन तब्बल १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून शेतकऱ्यांचे तब्बल ४९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

४९२ कोटींचे नुकसान : जिल्हा उपनिबंधकांचे शिक्कामोर्तबरूपेश उत्तरवार - यवतमाळनिसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या नगदी पिकाचे उत्पादन तब्बल १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून शेतकऱ्यांचे तब्बल ४९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. खुद्द जिल्हा उपनिबंधकांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. सन २०१३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी पीक परिस्थिती चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले झाले. गतवर्षी तब्बल १८ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांना झाले. त्याची किमत ७२० कोटी रुपये एवढी आहे. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र एक लाख क्विंटलने घटले. यंदा केवळ तीन लाख एक हजार ७११ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्ता भूईसपाट झाला. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन हातचा निघून गेला. सोयाबीनच्या दाण्याचा आकार ज्वारीऐवढा झाला आहे. सोयाबीनचे संभाव्य उत्पादन आणि त्याच्या काढणीचा खर्च याचा ताळमेळ न बसल्याने अखेर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडली. यावरून सोयाबीनची स्थिती स्पष्ट होते. यावर्षी केवळ दीड लाख क्विंटल सोयाबीन झाले असून त्याची किमत ४८ कोटी रुपये आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून हे नुकसान ४९२ कोटी रुपयांचे आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक (सहकार) जितेंद्र कंडारे यांनी ‘लोकमत’ला दिली. सोयाबीन पीक हातातून गेले. त्यामुळे आगामी पाच वर्षतरी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही.