शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

सोयाबीन शेंगाविना अन् पऱ्हाटीला पाच बोंडे

By admin | Updated: November 16, 2015 02:20 IST

निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे. यावर्षी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच धरल्या नाही.

शेतकरी हवालदिल : निसर्गाच्या अवकृपेने बजेट बिघडले, रबी हंगामही संकटातयवतमाळ : निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे. यावर्षी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच धरल्या नाही. तर आता पऱ्हाटीलाही चार ते पाचच बोंडे आहेत. त्यामुळे लावलागवडीचा खर्चही निघणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात पाऊस आला. पिकांना जीवदान मिळाले. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अशा स्थितीत तळपत्या उन्हाने सोयाबीन करपून गेले. झाडाची पाने पिवळी पडून गळून गेली. शेंगाही भरल्या नाही. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा त्यात जनावरे सोडणे शेतकऱ्यांना सोईचे झाले. त्यामुळेच सोयाबीनपासून उत्पन्नाची कोणतीही आशा शेतकऱ्यांना नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर किडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरली नाही. सध्या चार ते पाच बोंडे पऱ्हाटीला दिसत आहे. त्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.नांगरणीपासून वेचणीपर्यंत शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. बी-बियाणे, मजुरांची मजुरी, अंतर मशागत, रासायनिक खते, फवारणी आदींमध्ये जवळपास एकरी पाच ते पाच हजार रुपये खर्च येतो. आजच्या स्थितीत एकरी दोन क्ंिवटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च निघते की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या कपाशीचे भावही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी आहे. शेतकऱ्यांपेक्षा मजुरांची स्थिती चांगली दिसत आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. रबी हंगामापासून शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु मशागतीसाठीच पैसे नाही. त्यातच भारनियमनाचे संकट आहे. अशा परिस्थितीत रबी पिकही शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता कमी आहे.गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ येत आहे. अशा स्थितीत शासन मदत घोषित करते. मात्र ही मदतही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता गावागावातील शेतकरी विचारत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)