शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

सोयाबीन शेंगाविना अन् पऱ्हाटीला पाच बोंडे

By admin | Updated: November 16, 2015 02:20 IST

निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे. यावर्षी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच धरल्या नाही.

शेतकरी हवालदिल : निसर्गाच्या अवकृपेने बजेट बिघडले, रबी हंगामही संकटातयवतमाळ : निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे. यावर्षी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच धरल्या नाही. तर आता पऱ्हाटीलाही चार ते पाचच बोंडे आहेत. त्यामुळे लावलागवडीचा खर्चही निघणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात पाऊस आला. पिकांना जीवदान मिळाले. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अशा स्थितीत तळपत्या उन्हाने सोयाबीन करपून गेले. झाडाची पाने पिवळी पडून गळून गेली. शेंगाही भरल्या नाही. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा त्यात जनावरे सोडणे शेतकऱ्यांना सोईचे झाले. त्यामुळेच सोयाबीनपासून उत्पन्नाची कोणतीही आशा शेतकऱ्यांना नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर किडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरली नाही. सध्या चार ते पाच बोंडे पऱ्हाटीला दिसत आहे. त्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.नांगरणीपासून वेचणीपर्यंत शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. बी-बियाणे, मजुरांची मजुरी, अंतर मशागत, रासायनिक खते, फवारणी आदींमध्ये जवळपास एकरी पाच ते पाच हजार रुपये खर्च येतो. आजच्या स्थितीत एकरी दोन क्ंिवटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च निघते की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या कपाशीचे भावही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी आहे. शेतकऱ्यांपेक्षा मजुरांची स्थिती चांगली दिसत आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. रबी हंगामापासून शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु मशागतीसाठीच पैसे नाही. त्यातच भारनियमनाचे संकट आहे. अशा परिस्थितीत रबी पिकही शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता कमी आहे.गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ येत आहे. अशा स्थितीत शासन मदत घोषित करते. मात्र ही मदतही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता गावागावातील शेतकरी विचारत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)