शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव आरोग्य अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सोयाबीनचा साठा

By admin | Updated: April 26, 2017 00:06 IST

नेर तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रूग्णांना सेवा न देता चक्क सोयाबीनचा धंदा करतात,

गोदामाचे स्वरूप : नेरच्या सभापतींकडून भंडाफोड, चौकशीचे आदेश यवतमाळ : नेर तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रूग्णांना सेवा न देता चक्क सोयाबीनचा धंदा करतात, असा आरोप नेरच्या सभापती मनीषा गोळे यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. यानंतर लगेच त्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. नेर तालुक्यातील बोरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी कधीच कर्तव्यावर उपस्थित नसतात, असा आरोप सभापती मनीषा गोळे यांनी केला. काही दिवसांपूर्वी या केंद्राला अकस्मात भेट दिली असता, ते गैरहजर आढळले. त्यांच्या सुटीचा अर्जही नव्हता. एवढेच नव्हे तर ते चक्क सोयाबीनचा धंदा करतात, असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या शासकीय क्वॉर्टरमध्ये आजही चक्क सोयाबीन भरून असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून सभागृहात एकच खळबळ उडाली. अध्यक्ष माधुरी आडे, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मान्य केले. तसेच लगेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. चौकशीअंती त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देशही सिंगला यांनी दिले. आरोग्य विभागावरील चर्चेत स्वाती येंडे यांनी लोणबेहळ येथील आरोग्य केंद्रात पाणी टंचाई असल्याने रूग्णांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे सांगितले. लाख रायाजी येथील पाईप लाईन फुटल्याने दूषित पाणी नळाव्दारे घरोघरी पोहोचून अनेक ग्रामस्थांना डायरियाची लागण झाल्याचे तेथील महिला सदस्याने सांगितले. काही ठिकाणी चक्क सफाई कर्मचारीच डॉक्टरची भूमिका बजावत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्ह्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची १६ पदे असून त्यापैकी सहा पदे रिक्त असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी के. झेड. राठोड यांनी सभेत सांगितले. (शहर प्रतिनिधी) ‘सीईओ’ समस्या हसण्यावरी नेतात शिवसेनेचे सदस्य श्रीधर मोहोड यांनी चर्चेदरम्यान, सदस्यांचे अनेक प्रश्न, समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी हसण्यावरी नेत असल्याचा आरोप केला. अनेक सदस्य नवखे असल्याने त्यांना व्यवस्थित समस्या मांडता येत नसतील, मात्र त्यांची तळमळ महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे प्रशासनाने जनतेच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.