शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या संकटात

By admin | Updated: June 26, 2016 02:33 IST

जिल्ह्यात पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी पेरण्याची गती वाढविली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नाही तर उद्या पाऊस बरसेल,

पावसाची उघडीप : दुष्काळी वर्षानंतर हवामानाचा अंदाज फेलयवतमाळ : जिल्ह्यात पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी पेरण्याची गती वाढविली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नाही तर उद्या पाऊस बरसेल, या आशेवरच तीन लाख २६ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या. प्रत्यक्षात पावसाने अनेक भागात उघडीप दिली. यामुळे पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. जिल्ह्यात २५ जूनपर्यंत सरासरी १०७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १० टक्के आहे. गतवर्षी या सुमारास बहुतांश पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र यावर्षी केवळ ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने आयुक्त कार्यालयाकडे नुकताच सादर केला आहे. मान्सूनच्या पावसाची गती सर्वच परिसरात कायम राहते. यावर्षीचा मान्सून सर्वव्यापी असला तरी पावसाची गती संथ आहे. यामुळे काही भागात तुरळक बरसलेला पाऊस इतर भागात बरसला नाही. अशीच अवस्था शेत शिवारात पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात पावसाचा शिरवा तर कुठे कोरडे शिवार राहत असल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे तीन लाख २६ हजार हेक्टरवरच्या पेरण्या अधांतरी आहेत.आजचा ढग आपल्या शिवारात बरसणार किंवा नाही, याची शाश्वती मिळणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. पेरण्या उलटणार तर नाही ना, म्हणून शेतकरी चातकाप्रमाणे वरूणराजाची वाट पाहात आहेत. (शहर वार्ताहर)८३ कोटींचा खर्च मातीमोल होण्याचा धोकाखरिपाची पेरणी करण्यासाठी दरवर्षी बाजारात २५० कोटींची उलाढाल होते. यामध्ये प्रामुख्याने खत आणि बियाण्यांचा समावेश आहे. पेरणीपूर्व मशागत आणि मजुरीचा खर्च तो वेगळाच आहे. शेतकऱ्यांची मेहनत ती वेगळीच. बियाणे आणि खताचा ३० टक्के खर्च ८३ क ोटींच्या घरात आहे. पावसाअभावी हा खर्च मातीमोल तर होणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी सावकारांचे उंबरठे झिजविले. काहींनी घरातील दागदागिने गहाण ठेऊन किंवा मोडून पैशाची जुळवाजुळव केली. मात्र पाऊस नसल्याने त्यांच्यात चिंता निर्माण झाली आहे.