शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या संकटात

By admin | Updated: June 26, 2016 02:33 IST

जिल्ह्यात पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी पेरण्याची गती वाढविली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नाही तर उद्या पाऊस बरसेल,

पावसाची उघडीप : दुष्काळी वर्षानंतर हवामानाचा अंदाज फेलयवतमाळ : जिल्ह्यात पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी पेरण्याची गती वाढविली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नाही तर उद्या पाऊस बरसेल, या आशेवरच तीन लाख २६ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या. प्रत्यक्षात पावसाने अनेक भागात उघडीप दिली. यामुळे पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. जिल्ह्यात २५ जूनपर्यंत सरासरी १०७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १० टक्के आहे. गतवर्षी या सुमारास बहुतांश पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र यावर्षी केवळ ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने आयुक्त कार्यालयाकडे नुकताच सादर केला आहे. मान्सूनच्या पावसाची गती सर्वच परिसरात कायम राहते. यावर्षीचा मान्सून सर्वव्यापी असला तरी पावसाची गती संथ आहे. यामुळे काही भागात तुरळक बरसलेला पाऊस इतर भागात बरसला नाही. अशीच अवस्था शेत शिवारात पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात पावसाचा शिरवा तर कुठे कोरडे शिवार राहत असल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे तीन लाख २६ हजार हेक्टरवरच्या पेरण्या अधांतरी आहेत.आजचा ढग आपल्या शिवारात बरसणार किंवा नाही, याची शाश्वती मिळणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. पेरण्या उलटणार तर नाही ना, म्हणून शेतकरी चातकाप्रमाणे वरूणराजाची वाट पाहात आहेत. (शहर वार्ताहर)८३ कोटींचा खर्च मातीमोल होण्याचा धोकाखरिपाची पेरणी करण्यासाठी दरवर्षी बाजारात २५० कोटींची उलाढाल होते. यामध्ये प्रामुख्याने खत आणि बियाण्यांचा समावेश आहे. पेरणीपूर्व मशागत आणि मजुरीचा खर्च तो वेगळाच आहे. शेतकऱ्यांची मेहनत ती वेगळीच. बियाणे आणि खताचा ३० टक्के खर्च ८३ क ोटींच्या घरात आहे. पावसाअभावी हा खर्च मातीमोल तर होणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी सावकारांचे उंबरठे झिजविले. काहींनी घरातील दागदागिने गहाण ठेऊन किंवा मोडून पैशाची जुळवाजुळव केली. मात्र पाऊस नसल्याने त्यांच्यात चिंता निर्माण झाली आहे.