शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तालुक्यातील पेरणी सापडली धोक्यात

By admin | Updated: July 9, 2015 02:38 IST

पावसाने डोळे वटारल्यामुळे उमरखेड तालुक्यातील हजारों हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहे.

पावसाने वटारले डोळे : मुलांनी काढली पाण्यासाठी धोंडी, आता केवळ प्रार्थनाउमरखेड : पावसाने डोळे वटारल्यामुळे उमरखेड तालुक्यातील हजारों हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-दिन दिवसांपासून तालुक्यात लहान मुले धोंडी-धोंडी पाणी दे म्हणत फिरत आहे. मृग नक्षत्रात पुरेसा पाऊस झाला नसला तरी देखील तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. तालुक्यात कपाशी व सोयाबीनची सर्वाधिक लागवड आहे. पेरणी नंतर पाऊस येईलच अशी अपेक्षा होती, परंतु कपाशीच्या बियाण्याला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊस झालाच नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाण्यांचे अंकुर करपून गेले आहेत. मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. महागडे कपाशीचे बियाणे शेतात रोवण्यात आले. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरव्दारा ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या वीज भारनियमनामुळे अनेकांना पाणी असूनही ओलित करता आले नाही. मृग संपल्यानंतरसुद्धा पाऊस न आल्यामुळे महागडे बियाणे नष्ट झाले आहे. मृग नक्षत्र संपल्यानंतर तरी पाऊस येईल अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे टक लावून बसला आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतातील पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे वरूणराजाकडे प्रार्थना केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्यास शेतकऱ्यांपुढे शिल्लक नाही. (शहर प्रतिनिधी)