शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तालुक्यातील पेरणी सापडली धोक्यात

By admin | Updated: July 9, 2015 02:38 IST

पावसाने डोळे वटारल्यामुळे उमरखेड तालुक्यातील हजारों हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहे.

पावसाने वटारले डोळे : मुलांनी काढली पाण्यासाठी धोंडी, आता केवळ प्रार्थनाउमरखेड : पावसाने डोळे वटारल्यामुळे उमरखेड तालुक्यातील हजारों हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-दिन दिवसांपासून तालुक्यात लहान मुले धोंडी-धोंडी पाणी दे म्हणत फिरत आहे. मृग नक्षत्रात पुरेसा पाऊस झाला नसला तरी देखील तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. तालुक्यात कपाशी व सोयाबीनची सर्वाधिक लागवड आहे. पेरणी नंतर पाऊस येईलच अशी अपेक्षा होती, परंतु कपाशीच्या बियाण्याला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊस झालाच नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाण्यांचे अंकुर करपून गेले आहेत. मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. महागडे कपाशीचे बियाणे शेतात रोवण्यात आले. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरव्दारा ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या वीज भारनियमनामुळे अनेकांना पाणी असूनही ओलित करता आले नाही. मृग संपल्यानंतरसुद्धा पाऊस न आल्यामुळे महागडे बियाणे नष्ट झाले आहे. मृग नक्षत्र संपल्यानंतर तरी पाऊस येईल अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे टक लावून बसला आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतातील पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे वरूणराजाकडे प्रार्थना केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्यास शेतकऱ्यांपुढे शिल्लक नाही. (शहर प्रतिनिधी)