शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

ऊस, केळीचा पेरा दाखविणे भोवले

By admin | Updated: July 31, 2014 00:14 IST

शेतात सोयाबीन, कपाशी पेरलेली असताना वाढीव कर्ज मिळावे म्हणून केळी, ऊस दाखविणे शेकडो शेतकऱ्यांना चांगलेच भोवले आहे. जिल्हा बँकेतील एका संचालकाच्या स्वार्थी सल्ल्याने हे शेतकरी

शेकडो शेतकरी कर्जापासून वंचित : व्याजाचा बोजा, संचालकाच्या राजकारणाचे बळी यवतमाळ : शेतात सोयाबीन, कपाशी पेरलेली असताना वाढीव कर्ज मिळावे म्हणून केळी, ऊस दाखविणे शेकडो शेतकऱ्यांना चांगलेच भोवले आहे. जिल्हा बँकेतील एका संचालकाच्या स्वार्थी सल्ल्याने हे शेतकरी यावर्षी कर्जापासून आणि शून्य टक्के व्याजाच्या लाभापासून वंचित आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीक कर्ज वाटपाचा बराच घोळ आहे. एकीकडे सामान्य शेतकऱ्याला कर्जासाठी प्रचंड नियमावली दाखविली जाते तर दुसरीकडे संचालकाने शिफारस करताच तथाकथित शेतकऱ्यांना क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट कर्ज दिले जाते. अशा अव्वाच्या सव्वा कर्ज वाटपाचा गोरखधंदा पाच वर्षापूर्वी यवतमाळ तालुक्यात झाला होता. जिल्हा बँकेच्या एका संचालकाने आपले राजकारण डोळ्यापुढे ठेऊन या कर्ज वाटपाचा फंडा अवलंबिला होता. बँक सोयाबीनला हेक्टरी २५ हजार तर कपाशीला २८ ते ३० हजार रुपये पीक कर्ज देते. त्याच वेळी ऊस, केळी या सारख्या पिकाला ५० ते ६० हजार रुपये हेक्टरी कर्ज दिले जाते. एका संचालकाच्या शिफारसीवरून यवतमाळ तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना या ५० ते ६० हजार रुपये हेक्टरी कर्जाचे आमिष दाखविले गेले. शेतात सिंचनाची कोणतीही सोय नसताना शेतकऱ्यांनी ऊस, केळी लागवड दाखवून हेक्टरी ५० ते ६० हजाराचे कर्ज उचलले. त्यासाठी सेवा सोसायट्यांच्या तत्कालीन गटसचिवांना मॅनेज करण्यात आले. आक्रमक संचालकाचीच शिफारस असल्याने बँकेनेही या कर्जाला एनओसी दिली. संचालकाची राजकीय स्वार्थाची ही खेळी त्यावेळी कुण्याच शेतकऱ्याच्या लक्षात आली नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. परंतु आज हे सर्व शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यांना नवे कर्ज दिले जात नाही, शिवाय शून्य टक्के व्याजाचा लाभही मिळत नाही. उलट त्यांच्याकडून त्या ५० ते ६० हजाराच्या कर्जावर पावणे अकरा टक्के वार्षिक व्याज आकारले जात आहे. पाच वर्षांपूर्वी बोसग पद्धतीने घेतलेल्या पीक कर्जाचा फटका आता शेकडो शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या या शेतकऱ्यांना उत्पन्नच होत नसल्याने कर्ज भरावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका संचालकाचे स्वार्थी राजकारण आणि लालसा याचा बळी ठरलेले हे शेतकरी आता संधी मिळेल तेथे आपली कैफियत मांडत आहेत. मतदानासाठी शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या या दलबदलू संचालकाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)