शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासक पावसाने पेरणी सुरू

By admin | Updated: June 20, 2016 02:10 IST

जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली.

जिल्ह्यात ३२ मिमी पाऊस : शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य यवतमाळ : जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली. शनिवारी रात्री जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस कोसळला. मान्सून सक्रिय झाल्याने आता हमखास पाऊस बरसणार याची खात्री झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.सुरुवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील अवकाळी पावसानंतर अर्धे मृग नक्षत्र कोरडे गेले होते. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली होती. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित होते. अशातच शनिवारी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. हवामान खात्यानेही हा मान्सूनचा पाऊस असल्याचे शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस बरसला. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात नोंदविला गेला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी रविवारी पेरणीची लगबग सुरू केली. कपाशी, सोयाबीन, मूग, तूर, उडीद आदी पिकांची लागवड केली जात आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाने नदी, नाले खळखळून वाहू लागले आहे. जलस्रोतात वाढ झाली असून पाणीटंचाईलाही काही अंशी दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांची असह्य उकाड्यापासून सुटका झाली. लांबलेल्या पावसाने नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली ते शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. शनिवारच्या पावसाने धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र काही भागात झालेल्या जोरदार पावसाने बियाणे दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु काही का असे ना या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. येत्या काही दिवसात शेतात शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न फुलणार हे तेवढेच खरे. (शहर वार्ताहर)सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी कोसळला. यवतमाळ २८ मिमी, बाभूळगाव २२ मिमी, कळंब १२ मिमी, दारव्हा २७ मिमी, दिग्रस ५४ मिमी, नेर ३० मिमी, पुसद ५४ मिमी, महागाव ७४ मिमी, उमरखेड ४२ मिमी, केळापूर १४ मिमी, राळेगाव ९ मिमी, घाटंजी ५७ मिमी, मारेगाव ८ मिमी आणि झरी तालुक्यात ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.