शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

आश्वासक पावसाने पेरणी सुरू

By admin | Updated: June 20, 2016 02:10 IST

जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली.

जिल्ह्यात ३२ मिमी पाऊस : शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य यवतमाळ : जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली. शनिवारी रात्री जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस कोसळला. मान्सून सक्रिय झाल्याने आता हमखास पाऊस बरसणार याची खात्री झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.सुरुवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील अवकाळी पावसानंतर अर्धे मृग नक्षत्र कोरडे गेले होते. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली होती. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित होते. अशातच शनिवारी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. हवामान खात्यानेही हा मान्सूनचा पाऊस असल्याचे शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस बरसला. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात नोंदविला गेला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी रविवारी पेरणीची लगबग सुरू केली. कपाशी, सोयाबीन, मूग, तूर, उडीद आदी पिकांची लागवड केली जात आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाने नदी, नाले खळखळून वाहू लागले आहे. जलस्रोतात वाढ झाली असून पाणीटंचाईलाही काही अंशी दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांची असह्य उकाड्यापासून सुटका झाली. लांबलेल्या पावसाने नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली ते शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. शनिवारच्या पावसाने धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र काही भागात झालेल्या जोरदार पावसाने बियाणे दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु काही का असे ना या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. येत्या काही दिवसात शेतात शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न फुलणार हे तेवढेच खरे. (शहर वार्ताहर)सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी कोसळला. यवतमाळ २८ मिमी, बाभूळगाव २२ मिमी, कळंब १२ मिमी, दारव्हा २७ मिमी, दिग्रस ५४ मिमी, नेर ३० मिमी, पुसद ५४ मिमी, महागाव ७४ मिमी, उमरखेड ४२ मिमी, केळापूर १४ मिमी, राळेगाव ९ मिमी, घाटंजी ५७ मिमी, मारेगाव ८ मिमी आणि झरी तालुक्यात ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.