शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३४ हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: June 22, 2016 02:22 IST

जून महिना संपायला येत असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३४ हजार हेक्टरवरच खरिपाची पेरणी होऊ शकली आहे.

पाऊस लांबल्याचा परिणाम : शेतकरी वर्ग चिंतेत, गतवर्षी होती ५० टक्के यवतमाळ : जून महिना संपायला येत असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३४ हजार हेक्टरवरच खरिपाची पेरणी होऊ शकली आहे. पाऊस लांबल्याचा हा परिणाम मानला जात असला तरी आधीच दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी वर्ग यामुळे चिंतेत सापडला आहे. गेल्या वर्षी यावेळेपर्यंत साडेचार लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती. परंतु यावर्षी केवळ ३४ हजार हेक्टरवरच पेरणी पूर्ण होऊ शकली. त्यात कापूस २३ हजार ५७३ हेक्टर, सोयाबीन ३ हजार २१८ हेक्टर, तूर ५ा हजार १६३ हेक्टर, मूग ५५, उडीद ३२ तर ज्वारीची पेरणी २७ हेक्टरवर झाली आहे. अद्याप ऊसाची लागवड जिल्ह्यात कुठेच होऊ शकलेली नाही. गेल्या वर्षी आतापर्यंत पन्नास टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यावर्षी अद्याप हा आकडा पाच टक्क्यावरही पोहोचलेला नाही. जिल्ह्यात खरिपाचे नऊ लाख हेक्टर क्षेत्र आहे. पाऊस येत असला तो मान्सूनचा आहे की नाही, याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत पाहायला मिळत नाही. त्यामुळे अधूनमधून येणाऱ्या पावसावर विश्वास ठेऊन पेरणी करायची की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. गेली काही वर्ष दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला यावर्षी हवामान खात्याच्या ‘भरपूर पावसाच्या’ अंदाजामुळे दिलासा मिळाला होता. यंदाचे साल तरी चांगले जाईल, अशी त्याला आशा होती. परंतु पाऊस लांबल्याने या आशेची निराशा तर होणार नाही ना अशी हूरहूर शेतकरी वर्गाला लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे-खताची खरेदी करून ठेवली. आता तो पावसाची प्रतीक्षा करीत आहे. तर हजारो शेतकरी अद्यापही बँकांच्या दारातच अडकून आहे. त्यांच्या हाती पीक कर्जाचा पैसा मिळालेला नाही. कित्येक शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन न झाल्याने नवे कर्ज मिळविण्याचा त्यांचा मार्ग सुकर होऊ शकलेला नाही. कर्ज पुनर्गठनाचा हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेत पडून असल्याचे सांगितले जाते. (शहर वार्ताहर) हजारो शेतकरी कर्जासाठी अद्यापही बँकांच्या दारातचशेतकऱ्यांना पिकाचा विमा काढता यावा म्हणून ३१ जुलैपर्यंत त्याची मुदत वाढविण्यात आली आहे. या खरीप हंगामासाठी नवीन पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. पीक विमा संरक्षित रकमेचा हप्ता प्रती हेक्टर दोन टक्के याप्रमाणे राहणार आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर सरसकट ७० टक्के ठेवण्यात आला आहे.