शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उमरखेड तालुक्यात पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:40 IST

तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षाच : शेतकऱ्यांना सतावतेय पुन्हा दुष्काळाची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे. त्यांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाची भिस्त असलेले दोन नक्षत्र कोरडे गेल्याने आधीच शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहे. तब्बल महिनाभर पेरण्या खोळंबल्या होत्या. यावर्षी पेरणी लांबली. मात्र आर्द्रा नक्षत्राने दिलासा दिल्याने किमान पेरणी पूर्णत्वास गेली आहे.आर्द्रा नक्षत्रात शेवटच्या चरणात तालुकयात तुरळक पाऊस झाला. त्याच्याच भरवशावर शेतकºयांनी पेरणी आटोपली. आता मात्र केवळ ढगाळी वातावरण दिसत आहे. पावसाचा पत्ता नाही. आलाच तर एखादी सर कोसळते. मात्र दमदार पाऊस अद्याप झाला नाही. परिणामी जमितीन अद्याप खोलवर ओलावा पोहोचला नाही. जमिनीत ओलावा नसल्याने अंकुरलेल्या बियाण्याची वाड खुंटण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.नदी, नाले अद्याप कोरडेचदरवर्षी जुलै महिन्यात तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहतात. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अद्याप तालुक्यातील ओढे, नाले, नदी कोरडे आहेत. विहिरींमध्येही ठणठणाट आहे. जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. जुलै अखेरपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास पिकांवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीची भिती जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :agricultureशेती