शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उमरखेड तालुक्यात पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:40 IST

तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षाच : शेतकऱ्यांना सतावतेय पुन्हा दुष्काळाची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे. त्यांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाची भिस्त असलेले दोन नक्षत्र कोरडे गेल्याने आधीच शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहे. तब्बल महिनाभर पेरण्या खोळंबल्या होत्या. यावर्षी पेरणी लांबली. मात्र आर्द्रा नक्षत्राने दिलासा दिल्याने किमान पेरणी पूर्णत्वास गेली आहे.आर्द्रा नक्षत्रात शेवटच्या चरणात तालुकयात तुरळक पाऊस झाला. त्याच्याच भरवशावर शेतकºयांनी पेरणी आटोपली. आता मात्र केवळ ढगाळी वातावरण दिसत आहे. पावसाचा पत्ता नाही. आलाच तर एखादी सर कोसळते. मात्र दमदार पाऊस अद्याप झाला नाही. परिणामी जमितीन अद्याप खोलवर ओलावा पोहोचला नाही. जमिनीत ओलावा नसल्याने अंकुरलेल्या बियाण्याची वाड खुंटण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.नदी, नाले अद्याप कोरडेचदरवर्षी जुलै महिन्यात तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहतात. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अद्याप तालुक्यातील ओढे, नाले, नदी कोरडे आहेत. विहिरींमध्येही ठणठणाट आहे. जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. जुलै अखेरपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास पिकांवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीची भिती जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :agricultureशेती