चार पट पाऊस : यंदा सोयाबीनचा पेरा घटला, संततधार सुरूचवणी : तालुक्यात आता कपाशीची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी सोयाबिनच्या पेऱ्यात घट झाली असून आजपर्यंत मागीलवर्षीच्या तुलनेत चार पट जादा पाऊस झाला आहे.वणी तालुक्यात नियोजित ४६ हजार हेक्टरपैकी ४१ हजार २५० हेक्टरवर कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे. नियोजित आठ हजार १०० हेक्टरपैकी दोन हजार ५०० हेक्टरवर सोयाबिनची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच नियोजित सहा हजार हेक्टरपैकी दोन हजार हेक्टरवर तूर पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय प्रत्येकी २५ हेक्टवर मूग आणि उडीद पिकाची पेरणी झाली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी साधली आहे. त्यामुळे यावर्षी दुबार, तिबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे. यावर्षी तालुक्यात कापसाच्या लागवडीत वाढ झाली आहे. परिणामी सोयाबिनचा पेरा घटला आहे. तथापि सोयबीन पेरणीस अजून अवधी आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबिनची पेरणी केली नाही. गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने ही पेरणी खोळंबली आहे. तालुक्यात यावर्षी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. यावर्षी बियाण्यांची उगवण क्षमताही चांगली दिसून आली. शेतात बियाण्यांची उगवण झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तूर्तास हिरवे स्मित दिसून येत आहे. आता शेतकरी खत, डवरणी करण्याच्या कामाला लागले आहे.सोयाबिनच्या उत्पन्नात मागील वर्षात घट आल्याने यावर्षी शेतकरी पुन्हा कपाशीच्या लागवडीकडे वळले आहे. त्यांनी सोयाबिनची लागवड कमी केली आहे. त्यातच सोयाबीन बियाण्याच्या एक बॅगची किंमत दोन हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे कृषी केंद्रधारकांनी ही सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात खरेदी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)तालुक्यात तब्बल २८४ मिलीमीटर पाऊसवणी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी ७२ मिलीमीटर, तर रविवारी ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात आजपर्यंत तब्बल २८४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत केवळ ६७ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी चार पट जादा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता पेरणी पूर्णत्वास जात आहे. उर्वरित पेरणी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पावसामुळे तूर्तास पेरणी थांबली आहे. पावसाची संततधार अद्याप कायमचगेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही सुरूच होता. या पावसाने सोमवारी सकाळी थोडी उसंत ोतली होती. मात्र तरीही रिपरिप पाऊस सतत सुरूच होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी सुटी असल्यामुळे पावसाचा जादा त्रास झाला नाही. मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशीही पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.
वणी तालुक्यात ४१ हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी
By admin | Updated: June 23, 2015 00:29 IST