शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात ४१ हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी

By admin | Updated: June 23, 2015 00:29 IST

तालुक्यात आता कपाशीची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

चार पट पाऊस : यंदा सोयाबीनचा पेरा घटला, संततधार सुरूचवणी : तालुक्यात आता कपाशीची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी सोयाबिनच्या पेऱ्यात घट झाली असून आजपर्यंत मागीलवर्षीच्या तुलनेत चार पट जादा पाऊस झाला आहे.वणी तालुक्यात नियोजित ४६ हजार हेक्टरपैकी ४१ हजार २५० हेक्टरवर कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे. नियोजित आठ हजार १०० हेक्टरपैकी दोन हजार ५०० हेक्टरवर सोयाबिनची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच नियोजित सहा हजार हेक्टरपैकी दोन हजार हेक्टरवर तूर पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय प्रत्येकी २५ हेक्टवर मूग आणि उडीद पिकाची पेरणी झाली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी साधली आहे. त्यामुळे यावर्षी दुबार, तिबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे. यावर्षी तालुक्यात कापसाच्या लागवडीत वाढ झाली आहे. परिणामी सोयाबिनचा पेरा घटला आहे. तथापि सोयबीन पेरणीस अजून अवधी आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबिनची पेरणी केली नाही. गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने ही पेरणी खोळंबली आहे. तालुक्यात यावर्षी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. यावर्षी बियाण्यांची उगवण क्षमताही चांगली दिसून आली. शेतात बियाण्यांची उगवण झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तूर्तास हिरवे स्मित दिसून येत आहे. आता शेतकरी खत, डवरणी करण्याच्या कामाला लागले आहे.सोयाबिनच्या उत्पन्नात मागील वर्षात घट आल्याने यावर्षी शेतकरी पुन्हा कपाशीच्या लागवडीकडे वळले आहे. त्यांनी सोयाबिनची लागवड कमी केली आहे. त्यातच सोयाबीन बियाण्याच्या एक बॅगची किंमत दोन हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे कृषी केंद्रधारकांनी ही सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात खरेदी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)तालुक्यात तब्बल २८४ मिलीमीटर पाऊसवणी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी ७२ मिलीमीटर, तर रविवारी ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात आजपर्यंत तब्बल २८४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत केवळ ६७ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी चार पट जादा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता पेरणी पूर्णत्वास जात आहे. उर्वरित पेरणी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पावसामुळे तूर्तास पेरणी थांबली आहे. पावसाची संततधार अद्याप कायमचगेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही सुरूच होता. या पावसाने सोमवारी सकाळी थोडी उसंत ोतली होती. मात्र तरीही रिपरिप पाऊस सतत सुरूच होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी सुटी असल्यामुळे पावसाचा जादा त्रास झाला नाही. मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशीही पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.