शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वणी तालुक्यात ४१ हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी

By admin | Updated: June 23, 2015 00:29 IST

तालुक्यात आता कपाशीची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

चार पट पाऊस : यंदा सोयाबीनचा पेरा घटला, संततधार सुरूचवणी : तालुक्यात आता कपाशीची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी सोयाबिनच्या पेऱ्यात घट झाली असून आजपर्यंत मागीलवर्षीच्या तुलनेत चार पट जादा पाऊस झाला आहे.वणी तालुक्यात नियोजित ४६ हजार हेक्टरपैकी ४१ हजार २५० हेक्टरवर कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे. नियोजित आठ हजार १०० हेक्टरपैकी दोन हजार ५०० हेक्टरवर सोयाबिनची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच नियोजित सहा हजार हेक्टरपैकी दोन हजार हेक्टरवर तूर पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय प्रत्येकी २५ हेक्टवर मूग आणि उडीद पिकाची पेरणी झाली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी साधली आहे. त्यामुळे यावर्षी दुबार, तिबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे. यावर्षी तालुक्यात कापसाच्या लागवडीत वाढ झाली आहे. परिणामी सोयाबिनचा पेरा घटला आहे. तथापि सोयबीन पेरणीस अजून अवधी आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबिनची पेरणी केली नाही. गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने ही पेरणी खोळंबली आहे. तालुक्यात यावर्षी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. यावर्षी बियाण्यांची उगवण क्षमताही चांगली दिसून आली. शेतात बियाण्यांची उगवण झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तूर्तास हिरवे स्मित दिसून येत आहे. आता शेतकरी खत, डवरणी करण्याच्या कामाला लागले आहे.सोयाबिनच्या उत्पन्नात मागील वर्षात घट आल्याने यावर्षी शेतकरी पुन्हा कपाशीच्या लागवडीकडे वळले आहे. त्यांनी सोयाबिनची लागवड कमी केली आहे. त्यातच सोयाबीन बियाण्याच्या एक बॅगची किंमत दोन हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे कृषी केंद्रधारकांनी ही सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात खरेदी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)तालुक्यात तब्बल २८४ मिलीमीटर पाऊसवणी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी ७२ मिलीमीटर, तर रविवारी ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात आजपर्यंत तब्बल २८४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत केवळ ६७ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी चार पट जादा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता पेरणी पूर्णत्वास जात आहे. उर्वरित पेरणी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पावसामुळे तूर्तास पेरणी थांबली आहे. पावसाची संततधार अद्याप कायमचगेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही सुरूच होता. या पावसाने सोमवारी सकाळी थोडी उसंत ोतली होती. मात्र तरीही रिपरिप पाऊस सतत सुरूच होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी सुटी असल्यामुळे पावसाचा जादा त्रास झाला नाही. मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशीही पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.