शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या २४० कोटींचे लवकरच वितरण

By admin | Updated: July 31, 2015 00:14 IST

तब्बल महिनाभरापूर्वी पीकविमा कंपनीने राज्यात १६०० कोटींचा विमा मंजूर केला. त्यापैकी १३६० कोटी रुपये विविध बँकांकडे वळते करण्यात आले.

बँकांकडे रक्कम वळती : कंपनीच्या दिरंगाईचा १९ हजार शेतकऱ्यांना फटकायवतमाळ : तब्बल महिनाभरापूर्वी पीकविमा कंपनीने राज्यात १६०० कोटींचा विमा मंजूर केला. त्यापैकी १३६० कोटी रुपये विविध बँकांकडे वळते करण्यात आले. तर उर्वरित २४० कोटींचा निधीही शुक्रवारी २४ जुलै रोजी बँकांकडे वळता करण्यात आला. लवकरच या रकमेचे शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.दरम्यान, पीकविम्याच्या एकूण रकमेपैकी २४० कोटी अडकल्याची माहिती विमा कंपनीने बँकांपासूनही दडवून ठेवली होती. त्यामुळे बँकांही अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला. या विलंबाचा फटका राज्यभरातील एक लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांना बसला.राज्यातील शेतकऱ्यांना १६०० कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला होता. यामधून जिल्ह्यासाठी ७८ कोटी ८९ लाख ४८ हजार १३८ रूपये मंजूर झाले. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. जिल्हा बँकेने वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मात्र १९ राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप थांबविले होते. पीकविम्याची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नसल्याचे कारण बँकांनी पुढे केले. या गोंधळाने पात्र शेतकऱ्यांना संकटकाळात मदतीपासून वंचित राहावे लागले. पीकविम्याची रक्कम वाटपाच्या प्रक्रियेला जिल्हा बँकांनी प्रारंभ केला. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांमधून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यातून जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय कृषी पीकविम्याच्या १६०० कोटींपैकी १३६० कोटी वितरित करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यासाठी ७८ कोटी ८९ लाख ४८ हजार १३८ रूपये मंजूर करण्यात आले. याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ४५७ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६३ कोटी रूपयांचा पीकविमा जिल्हा बँकेच्या सदस्यांना मंजूर झाला आहे. तर १५ कोटींचा विमा राष्ट्रीयकृत बँकेच्या सदस्यांना मंजूर झाला आहे. यासाठी २०१४-१५ मध्ये शेतकऱ्यांनी नऊ कोटी ६७ लाख १२ हजार ६०० रूपये भरले होते. विमा मदतीस पात्र असताना या शेतकऱ्यांना मंजूर रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी संतप्त आहेत. (शहर वार्ताहर)