शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पीक विम्याच्या २४० कोटींचे लवकरच वितरण

By admin | Updated: July 31, 2015 00:14 IST

तब्बल महिनाभरापूर्वी पीकविमा कंपनीने राज्यात १६०० कोटींचा विमा मंजूर केला. त्यापैकी १३६० कोटी रुपये विविध बँकांकडे वळते करण्यात आले.

बँकांकडे रक्कम वळती : कंपनीच्या दिरंगाईचा १९ हजार शेतकऱ्यांना फटकायवतमाळ : तब्बल महिनाभरापूर्वी पीकविमा कंपनीने राज्यात १६०० कोटींचा विमा मंजूर केला. त्यापैकी १३६० कोटी रुपये विविध बँकांकडे वळते करण्यात आले. तर उर्वरित २४० कोटींचा निधीही शुक्रवारी २४ जुलै रोजी बँकांकडे वळता करण्यात आला. लवकरच या रकमेचे शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.दरम्यान, पीकविम्याच्या एकूण रकमेपैकी २४० कोटी अडकल्याची माहिती विमा कंपनीने बँकांपासूनही दडवून ठेवली होती. त्यामुळे बँकांही अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला. या विलंबाचा फटका राज्यभरातील एक लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांना बसला.राज्यातील शेतकऱ्यांना १६०० कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला होता. यामधून जिल्ह्यासाठी ७८ कोटी ८९ लाख ४८ हजार १३८ रूपये मंजूर झाले. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. जिल्हा बँकेने वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मात्र १९ राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप थांबविले होते. पीकविम्याची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नसल्याचे कारण बँकांनी पुढे केले. या गोंधळाने पात्र शेतकऱ्यांना संकटकाळात मदतीपासून वंचित राहावे लागले. पीकविम्याची रक्कम वाटपाच्या प्रक्रियेला जिल्हा बँकांनी प्रारंभ केला. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांमधून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यातून जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय कृषी पीकविम्याच्या १६०० कोटींपैकी १३६० कोटी वितरित करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यासाठी ७८ कोटी ८९ लाख ४८ हजार १३८ रूपये मंजूर करण्यात आले. याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ४५७ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६३ कोटी रूपयांचा पीकविमा जिल्हा बँकेच्या सदस्यांना मंजूर झाला आहे. तर १५ कोटींचा विमा राष्ट्रीयकृत बँकेच्या सदस्यांना मंजूर झाला आहे. यासाठी २०१४-१५ मध्ये शेतकऱ्यांनी नऊ कोटी ६७ लाख १२ हजार ६०० रूपये भरले होते. विमा मदतीस पात्र असताना या शेतकऱ्यांना मंजूर रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी संतप्त आहेत. (शहर वार्ताहर)