शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने समाधान, प्रकल्प तहानलेलेच

By admin | Updated: July 30, 2014 00:03 IST

जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते.

यवतमाळ : जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते. उशिरा आलेल्या पावसाने समाधान असले तरी जलसाठ्याची स्थिती मात्र अद्यापही गंभीर आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. गेल्या कित्येक वर्षात जुलै महिन्यात प्रकल्प ६० ते ७० टक्के भरतात. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रकल्पासह मध्यम आणि लघु प्रकल्पात ३० टक्केच्या आत पाणी आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात सध्या केवळ १८.३८ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाची क्षमता ३८८.३७ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी या प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी ३० जुलै रोजी या प्रकल्पात ८६ टक्के जलसाठा झाला होता. या प्रकल्पाचे दरवाजेही उघडावे लागले होते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी तशी स्थिती दिसत नाही.बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात ३४.१० टक्के, दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात १४.४९ टक्के, केळापूर तालुक्यातील सायखेडा प्रकल्पात ४३.८० टक्के, दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्पात ३०.७९ टक्के, यवतमाळ तालुक्यातील वाघाडी प्रकल्पात ३०.७९ टक्के, बोरगाव प्रकल्प ३९.६३ टक्के, महागाव तालुक्यातील लोअरपूस प्रकल्पात ४९.७२ टक्के, दारव्हा तालुक्यातील अडाण प्रकल्पात ११.९४ टक्के आणि वणी तालुक्यातील नवरगाव प्रकल्पात २७.४८ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश प्रकल्प गतवर्षी ओव्हर-फ्लो झाले होते. मात्र यंदा या प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ २७.९३ टक्के पाऊस जुलै अखेर झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५३.७१ मिमी पाऊस कोसळला. विशेष म्हणजे गतवर्षी ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात ८३५.६६ मिमी पावसाची नोंद झाली होती. आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गतवर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. मात्र यंदा लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचेच गणित बिघडविले आहे. पावसाचा वेग पाहता येत्या पंधरवड्यातही जलसाठ्याची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे वाहुन जाणाऱ्या पाण्याचा जमिनीत निचरा करणे आवश्यक असल्याचे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले. (नगर प्रतिनिधी)