शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

पावसाने समाधान, प्रकल्प तहानलेलेच

By admin | Updated: July 30, 2014 00:03 IST

जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते.

यवतमाळ : जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते. उशिरा आलेल्या पावसाने समाधान असले तरी जलसाठ्याची स्थिती मात्र अद्यापही गंभीर आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. गेल्या कित्येक वर्षात जुलै महिन्यात प्रकल्प ६० ते ७० टक्के भरतात. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रकल्पासह मध्यम आणि लघु प्रकल्पात ३० टक्केच्या आत पाणी आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात सध्या केवळ १८.३८ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाची क्षमता ३८८.३७ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी या प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी ३० जुलै रोजी या प्रकल्पात ८६ टक्के जलसाठा झाला होता. या प्रकल्पाचे दरवाजेही उघडावे लागले होते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी तशी स्थिती दिसत नाही.बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात ३४.१० टक्के, दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात १४.४९ टक्के, केळापूर तालुक्यातील सायखेडा प्रकल्पात ४३.८० टक्के, दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्पात ३०.७९ टक्के, यवतमाळ तालुक्यातील वाघाडी प्रकल्पात ३०.७९ टक्के, बोरगाव प्रकल्प ३९.६३ टक्के, महागाव तालुक्यातील लोअरपूस प्रकल्पात ४९.७२ टक्के, दारव्हा तालुक्यातील अडाण प्रकल्पात ११.९४ टक्के आणि वणी तालुक्यातील नवरगाव प्रकल्पात २७.४८ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश प्रकल्प गतवर्षी ओव्हर-फ्लो झाले होते. मात्र यंदा या प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ २७.९३ टक्के पाऊस जुलै अखेर झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५३.७१ मिमी पाऊस कोसळला. विशेष म्हणजे गतवर्षी ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात ८३५.६६ मिमी पावसाची नोंद झाली होती. आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गतवर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. मात्र यंदा लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचेच गणित बिघडविले आहे. पावसाचा वेग पाहता येत्या पंधरवड्यातही जलसाठ्याची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे वाहुन जाणाऱ्या पाण्याचा जमिनीत निचरा करणे आवश्यक असल्याचे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले. (नगर प्रतिनिधी)