शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

वनपाल परीक्षेबद्दल समाधान

By admin | Updated: September 11, 2015 02:55 IST

वनविभागातील क्षेत्रीय कामाच्या दृष्टीने वनपाल हे अत्यंत महत्वाचे पद आहे. मात्र २०११ पासून शासनाने थेट सरळसेवा भरती बंद करून संपूर्ण पदे पदोन्नतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला होता.

पांढरकवडा : वनविभागातील क्षेत्रीय कामाच्या दृष्टीने वनपाल हे अत्यंत महत्वाचे पद आहे. मात्र २०११ पासून शासनाने थेट सरळसेवा भरती बंद करून संपूर्ण पदे पदोन्नतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला होता. आता विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन २५ टक्के वनपालांची पदे निवडीचा निर्णय शासनाने घेतल्याने वन हक्क समितीने समाधान व्यक्त केले आहे.वनपाल हे क्षेत्रीय पद आहे. या पदाच्या कामाचे स्वरूप बघता या पदावर किमान पदवीधर व्यक्ती असणे आवश्यक भासू लागले होते. त्यामुळे क्षेत्रीय कामाचा अनुभव असलेल्या तरूण वनरक्षकांमधून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन २५ टक्के वनपाल पदाच्या निवडीचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाबद्दल वनहक्क समितीने समाधान व्यक्त केले आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे स्वरूपदेखील योग्य असून या परीक्षेचा अभ्यासक्रम वनपाल पदाच्या कामकाजासाठी पुरेशा ज्ञानाची कसोटी पाहणारा असल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे विभागीय परीक्षेतून निवड झालेले वनपाल हे निश्चितपणे पदोन्नती व सरळसेवा वनपालांच्या तुलनेत सरस ठरतील, असा दावा समितीने केला आहे.विभागीय स्पर्धा परीक्षेचा हा निर्णय वनविभागात शैक्षणिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांची क्षेत्रीय फळी निर्माण करून खात्याच्या विकासासाठी उचललेले अत्यंत महत्वपूर्ण पाऊल असल्याने या निर्णयाचे वनहक्क समितीने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे पदवीधर वनरक्षकांना परीक्षा देऊन पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यात सामाधानाचे वातावरण दिसून येत आहे. विभागीय परीक्षेतून केवळ २५ टक्के वनपालांची पदे भरली जाणार आहे. त्यामुळे ७५ टक्के पदे पदोन्नतीनेच भरली जातील. तरीही वनरक्षक संघटनेने ही परीक्षा रद्द करण्याची केलेली मागणी दुर्दैवी असल्याचेही समितीने म्हटले आहे. (वार्ताहर)