शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

कोळंबी-अकोलाबाजार परिसरात सौरऊर्जा प्रकल्प

By admin | Updated: March 17, 2017 02:45 IST

शेतकऱ्यांना पुरेशा दाबाचा वीज पुरवठा देण्यासाठी कृषी फिडर सौरउर्जेवर चालविण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : राज्यात तीन प्रकल्प यवतमाळ : शेतकऱ्यांना पुरेशा दाबाचा वीज पुरवठा देण्यासाठी कृषी फिडर सौरउर्जेवर चालविण्यात येणार आहे. २ मेगावॅट सौरउर्जेचा पथदर्शी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी, सोलापूर जिल्ह्यातील सालसे व नगर जिल्ह्यात करजुळे पठार येथे उभारण्यात येणार आहे. उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकारत आहे. शेतकऱ्यांचे परावलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात वीज पुरवठ्याची समस्या प्रामुख्याने विचारात घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मुबलक तसेच पुरेशा दाबाचा वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. विजेअभावी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री जाऊन ओलित करावे लागते. ही स्थिती सुधारण्यासाठी व सौरउर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शेतीसाठी विजेची स्थिती सुधारली असली तरी पर्यावरणसंवादी विजेचा शेतीसाठी वापर करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने २ मेगावॅटचा सौर उर्जा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी अकोलाबाजार फिडरवर मांजर्डा येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच करजुळे पठार, संगमनेर ता. जि. नगर, व सोलापूर जिल्ह्यातील सालसे ता. बार्शी येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कृषी फिडरचे विलगीकरण झाले आहे. त्या ठिकाणी खासगी विकासकाच्या माध्यमातून कृषी फिडरचे सौरउर्जेवर विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना विजेच्या योग्य दाब तसेच दिवसा वीज मिळेल. राज्यात पहिल्यांदाच असा प्रकल्प राबविण्यात येणार असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)