शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

कळंबमध्ये माती परीक्षणाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:03 IST

आपल्या शेत जमिनीचा पोत काय, उपलब्ध पाण्यातील क्षारांचे प्रमाण किती व त्यानुसार कोणते पीक घेणे फायदेशिर आहे, ...

ठळक मुद्देयोग्य तपासणीच नाही : कृषी विभागाने दखल घेण्याची मागणी

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : आपल्या शेत जमिनीचा पोत काय, उपलब्ध पाण्यातील क्षारांचे प्रमाण किती व त्यानुसार कोणते पीक घेणे फायदेशिर आहे, याची माहिती शेतकºयांना करून देण्याचा कार्यक्रम कृषि विभागाने तिन वर्षांपूर्वी अंमलात आणला होता़ परंतु या सुपिकता निर्देशांकाचा कळंब तालुक्यात पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येते. कृषी विभागाकडून तपासणीच होत नसल्याची शेतकºयांची ओरड आहे.जमिनीचा सुपिकता निर्देशांक शेतकºयांना माहीत करून देण्यासाठी कृषी विभागाच्या वरिष्ठ पातळीवरुन एका कंपनीशी करार करण्यात आला होता. या माध्यमातून शेतकºयांना उत्पादन वाढीस चांगला फायदा मिळणार असल्याचा दावा कृषि विभागातर्फे करण्यात आला होता. परंतु बहुतांश शेतकºयांच्या जमिनीचा पोतच तपासला न गेल्याने हा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.बहुतांश वेळा शेतकºयांना स्वत:च्या जमिनीची क्षमता, पोत व गुणवत्ता माहीत नसते़ त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये कोणते पीक घेणे फायदेशीर ठरते, या पासुनही शेतकरी अनभिज्ञ असतात़ याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होतो़ परिणामी उत्पादनासाठी लागलेला खर्चही वर्षाच्या शेवटी निघत नाही, अशी शेतकºयांची दरवर्षीची ओरड असते़ त्यामुळे शेतकरी शेवटी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतात़ यापासून शेतकºयांची सुटका व्हावी किंबहुना काही प्रमाणात दिलासा मिळावा, या हेतुने शासनाने प्रत्येक गावातील जमिनीची पोत व त्यानुसार घ्यावयाच्या पीकांची व त्या अनुंषगाने द्यावयाच्या खत मात्रांची माहिती करुन देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता.प्रत्येक गावातील मातीचे साधारणत: तीस नमुने घेणे़ त्यानुसार ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, गहू, हरबरा, कापूस, मिर्ची, संत्रा, मोसंबी यातील कोणत्या पीकांसाठी संबधित गावातील जमीन फायदेशिर ठरू शकते, याचे परीक्षण करणे़, सोबतच पाणी व पानांचाही निर्देशांक काढणे. फलकाच्या माध्यमातून संबधित गावामध्ये कोणते पीक घेणे फायदेशिर आहे़ काय मात्रा द्यावी, याची माहीती देण्यात येणार होती़ परंतु बहुतांश गावामध्ये असे फलकच दिसून येत नाही, ही वास्तविकता आहे. काही गावांमध्ये जमीनीच्या सुपिकता निर्देशांकांची माहिती गावातील दर्शनी ठिकाणी फलकाच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. तालुक्यात लाखो शेतकरी असताना केवळ चार ते साडेचार हजार शेतकºयांच्या शेतीचे परीक्षण केल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. परंतु याचा किती शेतकºयांना काय फायदा झाला, याचे कुणाजवळी उत्तर नाही.