शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नुसतं भाईयो न् बेहनो मन्ल्यानं पोट भरीन काय?

By admin | Updated: January 4, 2017 00:20 IST

सरकारने नोटाबंदी केली. त्यानंतर कॅशलेस व्यवहारासाठी आग्रह धरला जात आहे. ३१ डिसेंबरला पंतप्रधानांनी विविध घोषणांचा पाऊसही पाडला.

नोटाबंदी, कॅशलेसने गोरगरीब संभ्रमात : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणांवरही यवतमाळातील सामान्यांचे सवाल अविनाश साबापुरे  यवतमाळ सरकारने नोटाबंदी केली. त्यानंतर कॅशलेस व्यवहारासाठी आग्रह धरला जात आहे. ३१ डिसेंबरला पंतप्रधानांनी विविध घोषणांचा पाऊसही पाडला. त्याबाबत मध्यमवर्गीयांमध्ये आनंदही पसरला आहे. परंतु, रस्त्यावर मजुरी करणाऱ्या माणसांचा आर्त आवाज अद्यापही सरकारी कानांपर्यंत पोहोचलेला नाही. झपाट्याने बदलणाऱ्या अर्थव्यवहारात आपले पोट भरणार की नाही, हाच सवाल त्यांचे काळीज कुरतडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी देशवासीयांना ५० दिवसांचा अवधी मागितला होता. तो देशाने दिलाही. त्यानंतर ‘नमो’स्टाईल घोषणा झाल्या. त्या घोषणांचा गरिबांना खरेच फायदा झाला का, होणार आहे का, झाला तर किती प्रमाणात, नाही झाला तर का नाही झाला आदी विषयांवर बुद्धिजीवी बेसुमार चर्चा करीत आहेत. पण प्रत्यक्ष गरीब माणसाला काय वाटते? त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न मंगळवारी ‘लोकमत’ने केला आणि हातावर पोट जगविणाऱ्या माणसांनी अंत:करण खुले केले... त्यांच्याच या प्रातिनिधिक प्रतिक्रिया! भाषा थोडी तडफ आहे. कडक आहे. किंचित गावंढळही वाटेल. पण तळमळ खरी आहे... समजून घ्या! मोदी बी आश्वासन देते आमच्यावानी चिल्लर लोकायच्या धंद्यावर नोटाबंदीचा लई फरक पडला. मोदी म्हणे का सबन ठिक होईन. पण झालं का? आता बी चिल्लर भेटून नाई राह्यले. मले लोकायची उधारी फेडाची हाये. पण धंदाच नाई चालून राह्यला तं पैसे द्याचे कोठून? ठप्प झाला माणूस. पह्यलेच्या सरकारवानी मोदी बी आश्वासन देते. अरे, साधी माही सिलेंडरची सबसिडी तं वेळेवर जमा होत नाई भाऊ. बाकी तं दूरच राह्यलं. आता मोदीनं भाषण केलं. पण मले काय वाट्टे, नुसतं भाईयो न् बेहनो मन्ल्यानं आमचं पोट भरीन काय? शेतकऱ्यायचं व्याज सरकार भरणार हाये. पण आमच्यासारख्याचं कोण हाये? आता पेपरमंदी येऊन राह्यलं का बराच पैसा बँकांयमंदी जमा झाला. तं मंग ह्या एवढा पैसा जाणार कुठं हाये? - संजय श्यामराव मेश्राम, पंक्चर दुरुस्तीवाला, मेडीकल चौक रोज-रोज बँकेत जाणार हावो का ? चार-पाच हजाराचा माल घेऊन मी धंदा कराले बसतो. तेच्यात एकांदा गिऱ्हाईक दोन हजाराची नोट देते. तेले चिल्लर द्यासाठी मी ह्या दुकानात, थ्या दुकानात चकरा मारा लागते. मी चिल्लर आणत राहू का धंदा करू? मी चिल्लर पाहात राह्यतो अन् गिऱ्हाईक निंगून जाते. आम्ही रोज कमावून रोज खाणारे माणसं हावो. कॅशलेस व्यवहार करून पैसे काढाले का रोज-रोज बँकेत जाणार हावो का? गिऱ्हाईकाकडून कॅशलेस पद्धतीने पैसे घेणे आमच्यासारख्या लहान-सहान दुकानदारांना पडवडणार तरी आहे का? बरं तेही जाऊद्या, आमच्या दुकानात रोज कोणता ना कोणता भिकारी येतेच, त्याले दोन रुपये द्याचे का त्याच्या अकाउंटमंदी टाकाचे? थे कॅशलेस मोठ्या लोकायसाठी ठिक हाये, आपले थे कामच नोहोय. - दिगांबर मराठे, फुटपाथवरील विक्रेता, तहसील परिसर, यवतमाळ पह्यले सरकारी आॅफीसात कॅशलेस करा सरकार आपल्याले कॅशलेस व्यवहार करा म्हंते. पण पह्यले सरकारी आॅफीसात तं करा म्हणा. आता बी तहसीलमंदी दाखला काढाले जा, बिना पैशाचा देते का तं पाहा. शंभराची नोट काहाडली का रप्पकन काम होते. मी आपला लहानचा धंदा करतो. मी तं गिऱ्हाईकायले पैसेच मागन. मले कॅशलेस कराचं असन तं सरकारनं सबन धंदेवाल्यायले पह्यले फ्रीमंदी (स्वाईप) मशीन देल्ली पाह्यजे. अन् फ्रीमंदी मशीन देल्ली बी तरी मले तेचं फुकटफाकट भाडं भराच लागन दर मह्यन्याले. नसला धंदा होय हे सरकारचा. सध्या तं चिल्लरचाच वांदा दुरुस्त करा म्हणा सरकारले. गिऱ्हाईक आला का मले चिल्लरसाठी हिंडा लागून राह्यलं. - रोहीत खोब्रागडे, रसवंती चालक, जिल्हा कचेरी परिसर काही बोलणार नाही अमराईपुरा परिसरातील हेअरसलूनवाल्याने तर मोदी सरकारविषयी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. पण तो जे काही बोलला, ते सध्यस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे होते. तो म्हणाला...भाऊ, मोदी काय म्हंते, काय नाई म्हनत, मले काई कराचं नाई. आपल्याले काई इचारू नका नं मी काई सांगणार नाई. आता आजकाल आपण बोलतो एक अन् लोकं अर्थ काढते दुसराच. आगाऊ संबंध खराब होते. कोण करे खटखट..! बायायचा गट थोडी माफ केला ? काई इचारू नका. मी काय सांगणार हावो बाप्पा? एवढंच समजून घ्या का पह्यले हजाराचा धंदा होये तं आता चारकशे भेट्टे. थे कॅशलेस तं मी पह्यलांदाच आयकलं. आपल्याले थे समजत बी नाई. इथं लोकं च्या पेते नं पैसे देते. नजरेपुढे पैसा पाहाची सवय हाये मले. बँकेतल्या बँकेत पैसे फिरले तं मले काय फायदा होईल? मी तं काई मोदीचं भाषण नाई आयकलं, पण तुम्ही सांगता का सरकार लोकायच्या कर्जाचं व्याज कमी करणार हाये. पण कवा करणार हाये? होतवरी काई खरं असते का ह्या लोकायचं? थे फक्त भाषण देते, करत काई नाई. व्याज माफ केलं तरी काई फरक नाई पडत. गटाच्या बाया एवढ्या फडफडत हाये. पण सरकारनं त्यायचा गट थोडीच माफ केला? लखपती लखपतीच होणार हाये अन् गरीब गरीबच राह्यणार हाये. अजून काय सांगू