शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कामठीतून होते जनावरांची तस्करी

By admin | Updated: March 3, 2017 02:02 IST

बंदी असतानाही विदर्भातून मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात जनावरांची तस्करी केली जात आहे.

व्हाया वणी : एक वर्षात जनावरांसह ५१ लाखांचा मुद्देमाल जप्तवणी : बंदी असतानाही विदर्भातून मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात जनावरांची तस्करी केली जात आहे. या तस्करीसाठी तस्करांना व्हाया वणी मार्गे आंध्रात पोहचणे सोईचे जात असल्याने याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर जनावरांची तस्करी केली जात आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी केलेल्या कारवायांमधून ही बाब पुढे आली आहे. महाराष्ट्रात जनावरांची कत्तल व मांस विक्रीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी विदर्भातून मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात जनावरांची तस्करी केली जात आहे. ही जनावरे हैद्राबाद येथे नेऊन त्यांची कत्तल केली जाते व मांस इतरत्र नेऊन विकले जात असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या तस्करीचे तार नागपुरातील कामठी भागात जुळले असून जमा केलेली जनावरे तेथून वाहनात कोंबून हैैद्राबाद येथे नेले जात आहे. त्यासाठी जाममार्गे पुढे हैैद्राबाद हायवेने ही जनावरे नेली जातात. किंवा ज्या मार्गाने लहान पोलीस ठाणी आहेत, त्या मार्गे जनावरांची तस्करी केली जात आहे. यासाठी तस्करांना वणी मार्ग सोईचा असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी या तस्करीवर वणी पोलिसांची करडी नजर असून गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कारवायांमधून पोलिसांनी ५० लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सन २०१६-१७ मध्ये वणी पोलिसांनी जनावरांच्या तस्करीच्या विषयात एकूण १० कारवाया केल्यात. त्यात १६६ जनावरांसह तस्करीसाठी वापरण्यात आलेले ट्रक, मिनी ट्रक आदी वाहने जप्त करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)