शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

‘कृषी’च्या पंचनाम्यांची संथगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे वळले आहे. समाधानकारक पावसानंतर जिल्हाभर सोयाबीनची लागवड झाली. मात्र प्रत्येक तालुक्यातून सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी त्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. यानंतर जिल्ह्यातील तब्बल सहा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे निकृष्ट सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी केल्या.

ठळक मुद्देसोयाबीनचे निकृष्ट बियाणे : तक्रारींकडे दुर्लक्ष, नुकसान भरपाई नगण्यच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन लागवडीनंतर अनेकांच्या शेतात बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यातील तब्बल सहा हजार शेतकऱ्यांनी निकृष्ट बियाण्याबाबत तक्रारी केल्या. हे प्रकरण न्यायालयात जाण्यापूर्वी कृषी संचालकांनी विक्रेते व कंपन्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेशही दिले होते. मात्र अद्यापही कृषी विभागाची गती संथच आहे. त्यामुळे कृषी समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी संताप व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे वळले आहे. समाधानकारक पावसानंतर जिल्हाभर सोयाबीनची लागवड झाली. मात्र प्रत्येक तालुक्यातून सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी त्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. यानंतर जिल्ह्यातील तब्बल सहा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे निकृष्ट सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी केल्या. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने याबाबत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर कृषी संचालकांकडेही पाठपुरावा करण्यात आला.सहा हजारांपैकी चार हजार शेतकऱ्यांच्या शेतात जावून पंचनामे करण्यात आले. त्यापैकी केवळ ९५२ शेतकºयांना तोकडी आर्थिक मदत मिळाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सर्व तालुका कृषी अधिकारी व बियाणे निरीक्षकांना शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र एकाही तालुक्यात गुन्हा दाखल झाला नाही. तत्पूर्वी पुणे येथील कृषी संचालकांनीही कारवाईचे आदेश दिले होते. त्याला जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रेंगाळली. मात्र आदेश देऊनही कारवाई न झाल्याने उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी संताप व्यक्त करून संबंधितांना धारेवर धरले.बियाणे निरीक्षक ठरले बिनकामाचेकृषी आयुक्त व जिल्हा कृषी अधीक्षकांनी आदेश देवूनही तालुका कृषी अधिकारी व बियाणे निरीक्षकांनी संबंधित कंपनी व विक्रेत्यांवर फौजदारी दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. जिल्ह्यात कुठेच गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यांचे आर्थिक नुकसान झाले. दुबार पेरणीमुळे संकट ओढवले. या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आम्हाला न्याय कधी मिळेल, अशी विचारणा शेतकरी करीत आहे. आता न्यायालयाच्या निकालाकडे त्यांचे लक्ष आहे.तालुका कृषी अधिकारी व बियाणे निरीक्षकांनी फौजदारी कारवाईस टाळाटाळ केली. यामुणे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत कृषी विभागाला निर्देश होते. आता न्यायालयाकडे लक्ष आहे.- बाळासाहेब कामारकरउपाध्यक्ष तथा सभापतीकृषी समिती, जिल्हा परिषद यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती