शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दारू दुकान हटविण्यासाठी सावळीत महिला आक्रमक

By admin | Updated: August 20, 2014 23:49 IST

आर्णी तालुक्यातील सावळीसदोबा येथे सुरू असलेल्या देशी दारू दुकानामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे अतिक्रमणातील दारू दुकान तत्काळ हटवावे, या

सावळीसदोबा : आर्णी तालुक्यातील सावळीसदोबा येथे सुरू असलेल्या देशी दारू दुकानामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे अतिक्रमणातील दारू दुकान तत्काळ हटवावे, या मागणीला घेवून महिला आक्रमक झाल्या आहे. त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत सदस्यांनीही यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. येथील आठवडी बाजारात असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे प्रामुख्याने महिला वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. सदर दुकान ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. वर्दळीच्या भागात असलेल्या दारू दुकानामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दारू ढोसून गोंधळ घालणाऱ्यांमुळे महिलांना रस्त्यातून ये-जा करणेही कठीण होवून बसले आहे. दारूड्यांचे अश्लील शब्दप्रयोग आणि हातवाऱ्यांमुळे महिलांची कुचंबना होत आहे. सहज उपलब्ध होत असलेल्या दारूमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. युवा पिढीही दारूच्या आहारी जात आहे. या समस्या ग्रामपंचायत सदस्य आणि महिलांनी तालुका ते जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे वारंवार मांडल्या. प्रत्यक्ष चर्चाही करण्यात आली. परंतु यावर कुठलाही उपाय काढण्यात आला नाही. त्यामुळे २२ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. ग्रामपंचायत सदस्य मारेकाबाई तुकाराम शिंदे, बेबी उकंडराव दरोडे, गंगुबाई परशराम गुंजकर, इंदिराबाई सटवा शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. यावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)