शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

‘हायब्रिड अ‍ॅन्यूईटी’तील रस्ते बांधकामांची संथगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:14 IST

जिल्ह्यात ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’अंतर्गत विविध कामे सुरू असून पुसद विभागातील कामांची गती अगदीच संथ असल्याची बाब पुढे आली आहे. काम मिळालेल्या मार्गांवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असताना त्याकडे दुर्लक्ष करून उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपुसद विभाग : १२५० कोटींची कामे, ११५ कोटी अ‍ॅडव्हॉन्स

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’अंतर्गत विविध कामे सुरू असून पुसद विभागातील कामांची गती अगदीच संथ असल्याची बाब पुढे आली आहे. काम मिळालेल्या मार्गांवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असताना त्याकडे दुर्लक्ष करून उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.एकट्या पुसद विभागात ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’अंतर्गत १२५० कोटी रुपयांची तीन कामे हाती घेण्यात आली आहे. जलालढाबा-औंढानागनाथ-माळेगाव-पुसद-माहूर ७५० कोटी, पुसद-दिग्रस-दारव्हा-नेर ३५० कोटी व दारव्हा-आर्णी १५० कोटी या कामांचा त्यात समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाने या मार्गांचे सर्वेक्षण प्रस्तावित केले होते. त्यानंतर तीन वेळा निविदा काढल्या गेल्या. अखेर वर्षभरापूर्वी कल्याण येथील ईगल कंस्ट्रक्शनला निविदा मंजूर झाली. चार महिन्यांपूर्वी कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली. त्यापोटी पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाने ११५ कोटी रुपयांची रक्कम मोबिलाईज अ‍ॅडव्हॉन्स म्हणून कंत्राटदाराला वळती केली. यातून कंत्राटदाराने मशीन खरेदी, क्रेशर युनिट उभारणे, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारणे, सर्वेक्षण आदी कामे अपेक्षित आहे. या योजनेत ६० टक्के शासन देणार असून ४० टक्के रक्कम बँक कर्ज म्हणून देणार आहे. करार झाल्यापासून त्या मार्गावरील संपूर्ण देखभाल-दुरुस्ती, खड्डे बुजविणे, सूचना फलक लावणे, अपघात होणार नाही याची दक्षता घेणे आदी जबाबदाºया कंत्राटदाराकडे असतात. याच कारणावरून त्या मार्गावर नव्याने देखभाल दुरुस्ती प्रस्तावित केली जात नाही. परंतु प्रत्यक्षात या तीनही मार्गावर कंत्राटदारांकडून देखभाल करण्यात येत नसल्याचा प्रकार पुढे आला. पर्यायाने या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघाताचा धोका वाढला आहे.काही कंत्राटदारांनी पुढे उपकंत्राटदार नेमल्याने व हे कंत्राटदार शोधण्यात वेळ गेल्याने उपरोक्त रस्त्याची कामे वेळेत होतील की नाही याबाबत साशंकता आहे. उपरोक्त तीनही मार्गांची कामे जादा दराने मंजूर झाली आहे. जलालढाबा ते माहूर ही ७५० कोटींची निविदा तब्बल ४७ टक्के जादा दराने मंजूर झाली आहे. त्यानंतरही कामाची गती संथ आहे. एका बाजूने रस्ता खोदला जात आहे. परंतु तेथे अद्यापही साहित्य येऊन पडलेले नाही. क्रेशर तयार नाही. सदर कंत्राटदाराचा उपकंत्राटदार शोधण्यातच बहुतांश अवधी निघून गेल्याची माहिती आहे. अशीच अवस्था अन्य मार्गांची आहे. दिग्रस-दारव्हा मार्गाच्या भीषण अवस्थेमुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रवासी व वाहनधारक त्रस्त आहेत.मुंबईच्या कंत्राटदाराला तब्बल ११५ कोटी रुपये अ‍ॅडव्हॉन्स देऊन उपयोग काय?, एवढा अ‍ॅडव्हॉन्स खरोखरच द्यायला हवा होता का असे मुद्दे उपस्थित केले जात आहे. एकूणच सार्वजनिक बांधकाम विभाग व राजकीय नेत्यांचा कंत्राटदारांवर कोणताही दबाव नसल्याचे कामांच्या संथगतीवरून स्पष्ट होते. या मागे मिलीभगत तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. झाडे कायम ठेऊन काही ठिकाणी रस्त्यांचा विकास करण्याचे बंधन असताना सर्रास झाडे तोडली जात आहे. कुठे शंभर झाडांना मंजुरी, प्रत्यक्षात तोड किती तरी अधिक असे प्रकार आहेत. परंतु वन विभाग, बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे.मंत्री, लोकप्रतिनिधी मूग गिळूननागरिक पुरते वैतागले असतानाही मंत्री, खासदार, आमदार व अन्य राजकीय नेते मंडळी प्रलंबित रस्त्यांच्या मुद्यावर कंत्राटदार कंपनी व बांधकाम खात्याला धारेवर धरताना दिसत नाही. छुटपुट समस्यांवर आक्रमक भूमिका घेऊन मीडियाचे लक्ष वेधणारे नेते रस्त्यांच्या या भीषण समस्येवर ब्रसुद्धा काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या ‘टाईमपास’ भूमिकेविरुद्ध तीव्र रोष व्यक्त होत आहे.७५० कोटींचा कंत्राट दिलेल्या रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत. कंत्राटदार या मार्गाची देखभाल-दुरुस्ती करीत नसल्याचे यावरून सिद्ध होते.