शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

वणीतील सेतू केंद्रात सावळागोंधळ

By admin | Updated: June 24, 2017 00:42 IST

दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.

राजस्व अभियानाचा अभाव : निर्धारित वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी लोकमत न्यूज नेटवर्क वणी : दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशासाठी अनेक प्रमाणपत्रांची विद्यार्थ्यांना तातडीने गरज आहे. त्यामुळे येथील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी व पालकांची सध्या गर्दी दिसून येते. परंतु सेतू सुविधा केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने केंद्राचा सावळा गोंधळ विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांची गरज असते. वास्तविक महसूल विभागाने महाराजस्व अभियानाअंतर्गत शाळा महाविद्यालयांमध्ये शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे सहजतेने उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र अशी शिबिरे घेण्यासाठी महसूल विभागाकडे वेळच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सेतू सुविधा केंद्राची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी सेतू केंद्रावर धडकतात. खासगी सेतू केंद्रामध्ये शुल्क अधिक लागत असल्याने विद्यार्थी व पालक शासकीय सेतू केंद्राकडे धाव घेतात. वणी येथे उपविभागीय कार्यालय असल्याने मारेगाव तहसील कार्यालयातील प्रमाणपत्राचे प्रस्तावही येथे येतात. महसूल विभागाने सेतू केंद्राबाहेर कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात, प्रमाणपत्राचे शुल्क व प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी दर्शविणारा फलक लावलेला आहे. मात्र या फलकावरील माहितीनुसार कार्यवाही केली जात नाही. खरे पाहता सेतू केंद्रात आता कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही. कोणते कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांची कागदपत्रांची स्कॅनिंग करून त्याला ते परत करावे लागते. तसेच संगणकातून निघणारी पावती त्याला द्यावी लागते. मात्र सेतू केंद्र चालक विद्यार्थ्यांना अर्जाच्या प्रती घेण्यास भाग पाडतात. संगणकाची पावती न देता त्यांना कच्ची पावती दिली जाते. त्यामुळे शुल्काची रक्कम शासनाकडे जमा होते की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. पावतीवर मुदत नसल्याने प्रमाणपत्र कधी मिळणार याचीची शास्वती नसते. जर पावतीवर दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र मिळाले नाही तर भरलेला सुविधा आतार परत करावा लागतो. मात्र सेतू केंद्र चालकाकडून विद्यार्थी व पालकांना प्रमाणपत्रासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रमाणपत्रांचे कित्येक प्रस्ताव गहाळ होण्याचे प्रकारही येथील सेतू केंद्रात घडत आहेत. तहसील परिसरात खासगी अर्जनविसांचा डेरा नागरिकांना कागदपत्रांचे लिखाण करून देण्यासाठी शासनाने काही अर्जनविसांची नियुक्ती केली आहे. त्यांची नावे फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांना कोणत्या कामासाठी किती शुल्क द्यावे, याचेसुद्धा नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र सेतू केंद्रावरील गर्दीचा फायदा घेऊन तहसील कार्यालय परिसरात अनेक अवैध खासगी अर्जनविसांनी आपला डेरा थाटला आहे. एक टेबल खुर्ची घेऊन मोकळ्या जागेत व रस्त्यावर दुकानदारी सुरू करून या अनधिकृत अर्जनविसांकडून ग्राहक शोधले जात आहे. या खासगी अर्जनविसांवर महसूल विभागाचाही निर्बंध नसल्याने परवानाधारक अर्जविस हैराण झाले आहे. महसूल अधिकाऱ्यांना या अनधिकृत अर्जनविसांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.