शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जिल्हा बँकेत आता सोळाही तालुक्यांना प्रतिनिधित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

सहकार मंत्र्यांच्या आदेशावर अंमलबजावणी करण्याबाबत अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेला नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने बँकेच्या उपविधीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ३० डिसेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात संचालक मंडळाच्या मतदारसंघांचे नवे सूत्र ठरविण्यात आले. त्यानुसार उपविधीत सुधारणा करून त्याला मंजुरी दिली.

ठळक मुद्देसंचालक मंडळ निवडणूक : २१ रोजी आमसभेत मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांच्या मतदारसंघ वाटपात फेरबदल करण्यात आले आहे. पूर्वी १६ तालुके मिळून १३ जागा होत्या. मात्र आता सर्व १६ ही तालुक्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.सहकार मंत्र्यांच्या आदेशावर अंमलबजावणी करण्याबाबत अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेला नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने बँकेच्या उपविधीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ३० डिसेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात संचालक मंडळाच्या मतदारसंघांचे नवे सूत्र ठरविण्यात आले. त्यानुसार उपविधीत सुधारणा करून त्याला मंजुरी दिली. ही उपविधी आता मंजुरीसाठी २१ जानेवारी रोजी बँकेच्या होणाऱ्या आमसभेत ठेवली जाणार आहे. त्यानंतर ती सहनिबंधकांमार्फत शासनाकडे मंजुरीला पाठविली जाईल. त्यानंतर यानुसारच बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेतली जाईल.बँकेच्या संचालक मंडळाची एकूण संख्या २१ आहे. नव्या उपविधीनुसार प्रत्येक तालुकानिहाय एकूण १६ जागा राहणार आहेत. पाच जागा आरक्षित राहतील. त्यापैकी दोन महिलांसाठी, एससी-एसटी, व्हीजेएनटी व ओबीसीसाठी प्रत्येकी एक अशी विभागणी राहील. या पाच पैकी दोन जागा रोटेशनने काढल्या जातील.निवडणुकीच्या या टर्मसाठी महागाव व आर्णी तालुक्याला हे रोटेशन दिले जाण्याची शक्यता आहे. पुढच्या टर्मला हे दोन तालुके वगळून अन्य १४ तालुक्यांसाठी रोटेशन काढले जाईल. २१ पैकी दोन जागा बिगर शेती व वैयक्तिक मतदारसंघासाठी राहणार आहे. अशा पद्धतीने या २१ जागांची विभागणी केली गेली.नव्या रचनेत प्रस्थापितांपुढे आव्हानपूर्वी जिल्हा बँकेच्या संचालकांची संख्या २८ होती. ९७ व्या घटना दुरुस्तीअंतर्गत २०१३ ला उपविधीत दुरुस्ती करून ती २१ वर आणण्यात आली. या २१ पैकी १६ तालुक्यांमिळून १३ जागा देण्यात आल्या होत्या. झरी-मारेगाव, पांढरकवडा-घाटंजी व आर्णी-दिग्रस हे तालुके एकत्र जोडून सहा ऐवजी तीन जागा करण्यात आल्या होत्या. अर्थात तीन जागा तालुका गटातून कमी केल्या गेल्या. उर्वरित पाच जागा आरक्षित तर जिल्हा गटाच्या सहा ऐवजी तीन जागा अशी विभागणी होती. परंतु प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र गट अर्थात जागा द्यावी, अशी मागणी करीत पांढरकवडा येथील विजय पाटील चालबर्डीकर व इतरांनी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे याचिका दाखल केली होती. ती मान्य करीत ना. देशमुख यांनी सोळाही तालुक्याला प्रत्येकी एक जागा देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थापनातून ‘लोकमत’ला देण्यात आली. संचालक मंडळाच्या नव्या रचनेमध्ये अनेकांना घरी बसावे लागण्याची व उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :bankबँक