शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरकप स्पर्धेत सहा तालुके उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:48 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देगावांना सहभागाचे आवाहन : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कचेरीत आढावा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यात या स्पर्धेत सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले हक्काचे पाणी कमाविण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पधेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सुभाष मानकर आदी उपस्थित होते.गतवर्षी या स्पर्धेत जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश होता. यावर्षीच्या स्पर्धेत राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी आणि दारव्हा या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा तालुक्यातील १०८ गावांचा समावेश जलयुक्त शिवारमध्ये आहे. त्यामुळे ही १०८ गावे १०० टक्के सहभागी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यवतमाळचा वॉटर कप यावर्षी निश्चितच वेगळा असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप संदर्भात यावषीर्ची पहिली बैठक यवतमाळमध्ये होत आहे. या माध्यमातून चांगली माणसे जोडून चांगल्या समाजाची निर्मिती हेच ध्येय आहे. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याला एक चांगले नेतृत्व लाभले आहे. प्रशासन, समाज आणि पाणी फाऊंडेशनचे समन्वयक यांच्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्हा या स्पर्धेत प्रथम येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामविकास दूत, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक आदी उपस्थित होते.