शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

वॉटरकप स्पर्धेत सहा तालुके उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:48 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देगावांना सहभागाचे आवाहन : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कचेरीत आढावा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यात या स्पर्धेत सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले हक्काचे पाणी कमाविण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पधेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सुभाष मानकर आदी उपस्थित होते.गतवर्षी या स्पर्धेत जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश होता. यावर्षीच्या स्पर्धेत राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी आणि दारव्हा या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा तालुक्यातील १०८ गावांचा समावेश जलयुक्त शिवारमध्ये आहे. त्यामुळे ही १०८ गावे १०० टक्के सहभागी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यवतमाळचा वॉटर कप यावर्षी निश्चितच वेगळा असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप संदर्भात यावषीर्ची पहिली बैठक यवतमाळमध्ये होत आहे. या माध्यमातून चांगली माणसे जोडून चांगल्या समाजाची निर्मिती हेच ध्येय आहे. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याला एक चांगले नेतृत्व लाभले आहे. प्रशासन, समाज आणि पाणी फाऊंडेशनचे समन्वयक यांच्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्हा या स्पर्धेत प्रथम येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामविकास दूत, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक आदी उपस्थित होते.