शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेचे सहा तर काँग्रेसचे पाच सभापती

By admin | Updated: March 15, 2017 00:08 IST

१६ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने ...

पंचायत समिती : भाजपाला तीन जागांवर रोखले, राष्ट्रवादीकडे एक, तीन ठिकाणी ईश्वरचिठ्ठी, क्रॉस कनेक्शनची धूम यवतमाळ : १६ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक सहा जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. सेनेच्याच बरोबरीने काँग्रेसने तब्बल पाच पंचायत समित्या पटकावल्या. सत्तेचा सर्वाधिक फौजफाटा असलेल्या भाजपाला मात्र केवळ तीन पंचायत समित्यांवर आपला सभापती निवडून आणता आला. राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्यातील केवळ पुसद ही एकमेव पंचायत समिती राखता आली. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस कनेक्शन पाहायला मिळाले. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष अनेक ठिकाणी कुठे एकमेकांच्या विरोधात तर कुठे साथीला होते. विशेष असे, परंपरागत भाजप-शिवसेना युती केंद्रात व राज्यात सत्तेत असली तरी पंचायत समित्यांच्या या निवडणुकीत हे दोनही पक्ष कुठेच एकत्र बसले नाहीत. शिवसेनेने तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. सर्वाधिक सहा पंचायत समित्यांमध्ये आपल्या पक्षाचा सभापती बसवून शिवसेनेने तेथे भगवा फडकविला. सेनेला उपसभापतिपदाच्याही तेवढ्याच जागा मिळाल्या. काँग्रेसला पाच सभापती तर तीन उपसभापती मिळविता आले. भाजपाला तीन सभापती बसविण्यात यश आले. बाभूळगाव येथील सभापतीची जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित होती. परंतु या संवर्गातून एकही उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहिली. तेथे उपसभापतिपद भाजपाकडे आहे. आता तेथे नव्याने सभापतिपदाचे आरक्षण काढले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. मात्र तेथे हे नवे आरक्षण लांबणीवर टाकून उपसभापतीलाच प्रभारी सभापती म्हणून ट्रिट करण्याची राजकीय खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रभारी सभापतीच्या निमित्ताने भाजपाला चार पंचायत समित्या मिळाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बालेकिल्यातील पुसद ही एकमेव समिती राखता आली. दोन जागांवर या पक्षाचे उपसभापती निवडून आले. पंचायत समित्यांमधील संख्याबळ पाहता अनेक ठिकाणी परंपरागत भाजपा-शिवसेना युती होवून या पक्षांना अधिकाधिक पंचायत समित्या आपल्याकडे राखता आल्या असत्या. मात्र या युतीत पालकमंत्रिपदाचे राजकारण शिरल्याने ही युती १६ पैकी कोणत्याही पंचायत समितीत दिसून आली नाही. उलट शक्य असेल तेथे शिवसेनेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुठे काँग्रेस तर कुठे राष्ट्रवादीची मदत घेतली. मग भाजपानेही शिवसेनेवर अवलंबून न राहता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साथीने आपले सभापती-उपसभापती बनविण्याचा प्रयत्न केला. या क्रॉस कनेक्शनच्या बळावर भाजपाने तीन सभापती व चार उपसभापती बनविले. दिग्रस, उमरखेड व राळेगाव येथे समसमान जागांमुळे ईश्वरचिठ्ठी काढावी लागली. त्यातही शिवसेनेचीच सरशी झाली. दिग्रस व उमरखेड येथे ईश्वरचिठ्ठीने शिवसेनेला कौल दिला. राळेगावमध्ये काँग्रेसचा सभापती ईश्वरचिठ्ठीने निवडून आला.