शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सहा गट, १२ गणांचे आरक्षण बदलणार

By admin | Updated: January 26, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला आरक्षणाला नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

आयोगाचे आदेश : जि.प., पं.स.ची संंबंधित निवडणूक लांबणार यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला आरक्षणाला नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचे सहा गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण बदलण्याचे आदेश दिले. यामुळे या गट व गणांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. आयोगाने मारेगाव तालुक्यातीाल कुंभा-मार्डी, वणी तालुक्यातील घोन्सा-कायर, नेर तालुक्यातील वटफळी-अडगाव, दारव्हा तालुक्यातील लाडखेड-वडगाव गाढवे आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी या सहा गटांसह, त्या अंतर्गत येणाऱ्या १२ पंचायत समिती गणांचे आरक्षण बदलण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने २३ जानेवारीला ६८५२/२०१६ व ६६१५/२०१६ या दोन याचिकांवर एकत्रित आदेश पारित करताना जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करताना झालेली चूक दुरूस्त करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाला दिली. त्यानुसार हे आरक्षण बदलविण्यात येणार आहे. तथापि प्रथम जिल्हा निवडणूक विभागाने आरक्षण निश्चिती योग्यच असल्याचा दावा केला होता. नंतर चूक झाल्याचे मान्य केले होते. राज्य निवडणूक आयोग्याच्या निर्देशामुळे त्यांचा पहिला दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने हे सहा गट व १२ गण वगळून निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या सहा गट व १२ गणांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. या सहा गट व १२ गणांसाठी आता २६ जानेवारीला आरक्षणात बदलाची सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. २७ जानेवारीला त्यावर हरकती व सूचना सादर करता येईल. ३० जानेवारीला प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन निर्णय देतील. लगेच आरक्षणात बदल करण्यात येत असल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. यात हरकती व सूचना सादर करण्यासाठी २८ जानेवारीला सुटीच्या दिवशीही निवडणूक विभागाचे काम सुरू ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. (शहर प्रतिनिधी) निवडणूक विभागाचा दावा फोल विडूळ-चातारी गटाचे काढलेले आरक्षण योग्यच असल्याचा दावा बुधवारी सायंकाळपर्यंत निवडणूक विभागाने केला होता. परंतु आयोगाने एक नव्हे तर तब्बल सहा गट व १२ गणांचे आरक्षण नव्याने काढण्याचे आदेश दिल्याने निवडणूक विभागाचा हा दावा फोल ठरला. न्यायालयाने केवळ विडूळ-चातारी गटात याचिकाकर्त्याचे समाधान करण्याच्या सूचना केल्या असताना प्रशासनाने अन्य पाच गटांंना नख लावण्यामागील कारण अस्पष्ट आहे. पुन्हा कोर्ट-कचेरीची चिन्हे विडूळ-चातारीचे वादग्रस्त आरक्षण उच्च न्यायालयापर्यंत गेल्याने त्याच नव्हे तर अन्य पाच गटांमध्ये फेरबदल झाले. त्यामुळे तेथील इच्छुकांचे गणित बिघडले. हे नाराज इच्छुक आमच्या पाच गटांमध्ये फेरबदल का ? असा प्रश्न उपस्थित करीत पुन्हा कोर्ट-कचेरी करण्याच्या तयारीत आहे. त्यात आर्णी तालुक्यातील देऊरवाडी-सुकळी सर्कलमधील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराची आघाडी आहे.