शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सहा गट, १२ गणांचे आरक्षण बदलणार

By admin | Updated: January 26, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला आरक्षणाला नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

आयोगाचे आदेश : जि.प., पं.स.ची संंबंधित निवडणूक लांबणार यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला आरक्षणाला नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचे सहा गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण बदलण्याचे आदेश दिले. यामुळे या गट व गणांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. आयोगाने मारेगाव तालुक्यातीाल कुंभा-मार्डी, वणी तालुक्यातील घोन्सा-कायर, नेर तालुक्यातील वटफळी-अडगाव, दारव्हा तालुक्यातील लाडखेड-वडगाव गाढवे आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी या सहा गटांसह, त्या अंतर्गत येणाऱ्या १२ पंचायत समिती गणांचे आरक्षण बदलण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने २३ जानेवारीला ६८५२/२०१६ व ६६१५/२०१६ या दोन याचिकांवर एकत्रित आदेश पारित करताना जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करताना झालेली चूक दुरूस्त करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाला दिली. त्यानुसार हे आरक्षण बदलविण्यात येणार आहे. तथापि प्रथम जिल्हा निवडणूक विभागाने आरक्षण निश्चिती योग्यच असल्याचा दावा केला होता. नंतर चूक झाल्याचे मान्य केले होते. राज्य निवडणूक आयोग्याच्या निर्देशामुळे त्यांचा पहिला दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने हे सहा गट व १२ गण वगळून निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या सहा गट व १२ गणांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. या सहा गट व १२ गणांसाठी आता २६ जानेवारीला आरक्षणात बदलाची सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. २७ जानेवारीला त्यावर हरकती व सूचना सादर करता येईल. ३० जानेवारीला प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन निर्णय देतील. लगेच आरक्षणात बदल करण्यात येत असल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. यात हरकती व सूचना सादर करण्यासाठी २८ जानेवारीला सुटीच्या दिवशीही निवडणूक विभागाचे काम सुरू ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. (शहर प्रतिनिधी) निवडणूक विभागाचा दावा फोल विडूळ-चातारी गटाचे काढलेले आरक्षण योग्यच असल्याचा दावा बुधवारी सायंकाळपर्यंत निवडणूक विभागाने केला होता. परंतु आयोगाने एक नव्हे तर तब्बल सहा गट व १२ गणांचे आरक्षण नव्याने काढण्याचे आदेश दिल्याने निवडणूक विभागाचा हा दावा फोल ठरला. न्यायालयाने केवळ विडूळ-चातारी गटात याचिकाकर्त्याचे समाधान करण्याच्या सूचना केल्या असताना प्रशासनाने अन्य पाच गटांंना नख लावण्यामागील कारण अस्पष्ट आहे. पुन्हा कोर्ट-कचेरीची चिन्हे विडूळ-चातारीचे वादग्रस्त आरक्षण उच्च न्यायालयापर्यंत गेल्याने त्याच नव्हे तर अन्य पाच गटांमध्ये फेरबदल झाले. त्यामुळे तेथील इच्छुकांचे गणित बिघडले. हे नाराज इच्छुक आमच्या पाच गटांमध्ये फेरबदल का ? असा प्रश्न उपस्थित करीत पुन्हा कोर्ट-कचेरी करण्याच्या तयारीत आहे. त्यात आर्णी तालुक्यातील देऊरवाडी-सुकळी सर्कलमधील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराची आघाडी आहे.