शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

निराधारांच्या मानधनात सहा कोटी रुपयांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना दिलासा : सहाशे रुपयांवरून मानधन झाले हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात वाढ केली आहे. सप्टेंबरपासून या नियमाची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या आणि वृद्ध महिलांना एक हजार रूपयांचे मानधन मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना होणार आहे. यामुळे निराधारांच्या मानधनापोटी होणाऱ्या खर्चात सहा कोटींची वाढ होणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.अशा व्यक्तींना एक अपत्य असेल तर ११०० आणि दोन अथवा त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर १२०० रूपये मानधन दिले जाणार आहे. ही अपत्ये २५ वर्षांचे होईपर्यंतच मानधन निराधारांना मिळणार आहे. त्यानंतर ते थांबविले जाणार आहे. आपल्या पाल्याने आई वडिलांचा सांभाळ करावा हा यामागचा उद्देश आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ, विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना हे वाढीव मानधन दिले जाणार आहे. या पाच योजनांचे जिल्ह्यात एक लाख ५८ हजार २२१ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना पूर्वी नऊ कोटी ४९ लाख ३२ हजार ६०० रूपयांचे मानधन दिले जात होते.वाढीव मानधनामुळे हा निधी १५ कोटी ८२ लाख २१ हजार रूपयांवर पोहचला आहे. यामध्ये सहा कोटी ३२ लाख ८८ हजार ४०० रूपयांची वाढ झाली आहे. मानधन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे निराधार लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून २० हजार१८ ते ६४ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशा कुटुंबाला २० हजारांची मदत शासनाकडून दिली जाते. जिल्ह्यातील ११७० लाभार्थ्यांना ही मदत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना