शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

निराधारांच्या मानधनात सहा कोटी रुपयांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना दिलासा : सहाशे रुपयांवरून मानधन झाले हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात वाढ केली आहे. सप्टेंबरपासून या नियमाची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या आणि वृद्ध महिलांना एक हजार रूपयांचे मानधन मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना होणार आहे. यामुळे निराधारांच्या मानधनापोटी होणाऱ्या खर्चात सहा कोटींची वाढ होणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.अशा व्यक्तींना एक अपत्य असेल तर ११०० आणि दोन अथवा त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर १२०० रूपये मानधन दिले जाणार आहे. ही अपत्ये २५ वर्षांचे होईपर्यंतच मानधन निराधारांना मिळणार आहे. त्यानंतर ते थांबविले जाणार आहे. आपल्या पाल्याने आई वडिलांचा सांभाळ करावा हा यामागचा उद्देश आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ, विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना हे वाढीव मानधन दिले जाणार आहे. या पाच योजनांचे जिल्ह्यात एक लाख ५८ हजार २२१ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना पूर्वी नऊ कोटी ४९ लाख ३२ हजार ६०० रूपयांचे मानधन दिले जात होते.वाढीव मानधनामुळे हा निधी १५ कोटी ८२ लाख २१ हजार रूपयांवर पोहचला आहे. यामध्ये सहा कोटी ३२ लाख ८८ हजार ४०० रूपयांची वाढ झाली आहे. मानधन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे निराधार लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून २० हजार१८ ते ६४ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशा कुटुंबाला २० हजारांची मदत शासनाकडून दिली जाते. जिल्ह्यातील ११७० लाभार्थ्यांना ही मदत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना