शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांच्या मानधनात सहा कोटी रुपयांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना दिलासा : सहाशे रुपयांवरून मानधन झाले हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात वाढ केली आहे. सप्टेंबरपासून या नियमाची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या आणि वृद्ध महिलांना एक हजार रूपयांचे मानधन मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना होणार आहे. यामुळे निराधारांच्या मानधनापोटी होणाऱ्या खर्चात सहा कोटींची वाढ होणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.अशा व्यक्तींना एक अपत्य असेल तर ११०० आणि दोन अथवा त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर १२०० रूपये मानधन दिले जाणार आहे. ही अपत्ये २५ वर्षांचे होईपर्यंतच मानधन निराधारांना मिळणार आहे. त्यानंतर ते थांबविले जाणार आहे. आपल्या पाल्याने आई वडिलांचा सांभाळ करावा हा यामागचा उद्देश आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ, विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना हे वाढीव मानधन दिले जाणार आहे. या पाच योजनांचे जिल्ह्यात एक लाख ५८ हजार २२१ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना पूर्वी नऊ कोटी ४९ लाख ३२ हजार ६०० रूपयांचे मानधन दिले जात होते.वाढीव मानधनामुळे हा निधी १५ कोटी ८२ लाख २१ हजार रूपयांवर पोहचला आहे. यामध्ये सहा कोटी ३२ लाख ८८ हजार ४०० रूपयांची वाढ झाली आहे. मानधन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे निराधार लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून २० हजार१८ ते ६४ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशा कुटुंबाला २० हजारांची मदत शासनाकडून दिली जाते. जिल्ह्यातील ११७० लाभार्थ्यांना ही मदत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना