शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

एकाच महिन्यात सहा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 18, 2015 02:24 IST

यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

सोनखास : यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावर असलेले मोठ्या प्रमाणात खड्डे, अनधिकृत ओव्हरलोड माल वाहतूक, अवैध प्रवासी वाहने आदी प्रवासातून हे अपघात घडले आहे. तरीदेखील बांधकाम व पोलीस विभाग यातून कोणताही बोध घेण्यास तयार नाही. या दोन्ही विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल, हे येणारा काळच ठरवेल.यवतमाळ ते नेर या ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. या मार्गावर ओव्हरलोड माल वाहतूक नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठमोठ्या कंटेनरद्वारे ओव्हरलोड मालवाहतूक होत आहे. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच अनेक चालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. तर अनेकदा रात्रीच्या सुमारास चालकाला झोपेची डुलकी आल्यानंतर खड्ड्यांमध्ये उसळून अपघात होत आहे. अनेक ट्रकचालक रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून नशापाणी करताना आढळतात. मात्र याकडे संबंधित विभागांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या मार्गातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा रोडला लागून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. बांधकाम विभागाने अनेक गावात स्पीड ब्रेकर न लावल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. लासीना, उत्तरवाढोणा व सोनखास ही दुतर्फा असलेली गावे आहे. लासिना येथे दोन तीन दिवसांपूर्वीच अंगणात उभ्या असलेल्या एका युवकास कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. अशा किती तरुणांना रस्त्यावर आपला जीव गमवावा लागेल तेव्हा बांधकाम विभागाला जाग येईल, असा प्रश्न आता गावकरी विचारू लागले आहे. प्रत्येक गावात दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावे तसेच पोलीस विभागाने रस्त्यावरील अनधिकृत ओव्हरलोड आणि अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)