शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एकाच महिन्यात सहा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 18, 2015 02:24 IST

यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

सोनखास : यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावर असलेले मोठ्या प्रमाणात खड्डे, अनधिकृत ओव्हरलोड माल वाहतूक, अवैध प्रवासी वाहने आदी प्रवासातून हे अपघात घडले आहे. तरीदेखील बांधकाम व पोलीस विभाग यातून कोणताही बोध घेण्यास तयार नाही. या दोन्ही विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल, हे येणारा काळच ठरवेल.यवतमाळ ते नेर या ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. या मार्गावर ओव्हरलोड माल वाहतूक नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठमोठ्या कंटेनरद्वारे ओव्हरलोड मालवाहतूक होत आहे. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच अनेक चालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. तर अनेकदा रात्रीच्या सुमारास चालकाला झोपेची डुलकी आल्यानंतर खड्ड्यांमध्ये उसळून अपघात होत आहे. अनेक ट्रकचालक रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून नशापाणी करताना आढळतात. मात्र याकडे संबंधित विभागांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या मार्गातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा रोडला लागून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. बांधकाम विभागाने अनेक गावात स्पीड ब्रेकर न लावल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. लासीना, उत्तरवाढोणा व सोनखास ही दुतर्फा असलेली गावे आहे. लासिना येथे दोन तीन दिवसांपूर्वीच अंगणात उभ्या असलेल्या एका युवकास कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. अशा किती तरुणांना रस्त्यावर आपला जीव गमवावा लागेल तेव्हा बांधकाम विभागाला जाग येईल, असा प्रश्न आता गावकरी विचारू लागले आहे. प्रत्येक गावात दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावे तसेच पोलीस विभागाने रस्त्यावरील अनधिकृत ओव्हरलोड आणि अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)