शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

एकाच महिन्यात सहा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 18, 2015 02:24 IST

यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

सोनखास : यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावर असलेले मोठ्या प्रमाणात खड्डे, अनधिकृत ओव्हरलोड माल वाहतूक, अवैध प्रवासी वाहने आदी प्रवासातून हे अपघात घडले आहे. तरीदेखील बांधकाम व पोलीस विभाग यातून कोणताही बोध घेण्यास तयार नाही. या दोन्ही विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल, हे येणारा काळच ठरवेल.यवतमाळ ते नेर या ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. या मार्गावर ओव्हरलोड माल वाहतूक नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठमोठ्या कंटेनरद्वारे ओव्हरलोड मालवाहतूक होत आहे. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच अनेक चालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. तर अनेकदा रात्रीच्या सुमारास चालकाला झोपेची डुलकी आल्यानंतर खड्ड्यांमध्ये उसळून अपघात होत आहे. अनेक ट्रकचालक रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून नशापाणी करताना आढळतात. मात्र याकडे संबंधित विभागांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या मार्गातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा रोडला लागून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. बांधकाम विभागाने अनेक गावात स्पीड ब्रेकर न लावल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. लासीना, उत्तरवाढोणा व सोनखास ही दुतर्फा असलेली गावे आहे. लासिना येथे दोन तीन दिवसांपूर्वीच अंगणात उभ्या असलेल्या एका युवकास कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. अशा किती तरुणांना रस्त्यावर आपला जीव गमवावा लागेल तेव्हा बांधकाम विभागाला जाग येईल, असा प्रश्न आता गावकरी विचारू लागले आहे. प्रत्येक गावात दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावे तसेच पोलीस विभागाने रस्त्यावरील अनधिकृत ओव्हरलोड आणि अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)