शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

एकाच महिन्यात सहा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 18, 2015 02:24 IST

यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

सोनखास : यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावर असलेले मोठ्या प्रमाणात खड्डे, अनधिकृत ओव्हरलोड माल वाहतूक, अवैध प्रवासी वाहने आदी प्रवासातून हे अपघात घडले आहे. तरीदेखील बांधकाम व पोलीस विभाग यातून कोणताही बोध घेण्यास तयार नाही. या दोन्ही विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल, हे येणारा काळच ठरवेल.यवतमाळ ते नेर या ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. या मार्गावर ओव्हरलोड माल वाहतूक नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठमोठ्या कंटेनरद्वारे ओव्हरलोड मालवाहतूक होत आहे. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच अनेक चालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. तर अनेकदा रात्रीच्या सुमारास चालकाला झोपेची डुलकी आल्यानंतर खड्ड्यांमध्ये उसळून अपघात होत आहे. अनेक ट्रकचालक रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून नशापाणी करताना आढळतात. मात्र याकडे संबंधित विभागांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या मार्गातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा रोडला लागून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. बांधकाम विभागाने अनेक गावात स्पीड ब्रेकर न लावल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. लासीना, उत्तरवाढोणा व सोनखास ही दुतर्फा असलेली गावे आहे. लासिना येथे दोन तीन दिवसांपूर्वीच अंगणात उभ्या असलेल्या एका युवकास कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. अशा किती तरुणांना रस्त्यावर आपला जीव गमवावा लागेल तेव्हा बांधकाम विभागाला जाग येईल, असा प्रश्न आता गावकरी विचारू लागले आहे. प्रत्येक गावात दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावे तसेच पोलीस विभागाने रस्त्यावरील अनधिकृत ओव्हरलोड आणि अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)