शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

सीतादईने कापूस वेचणीला सुरुवात

By admin | Updated: October 9, 2015 00:29 IST

यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले.

हिवरी : यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले. आता सीतादई करून शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजे कापूस. केंद्र व राज्य सरकारने कापसाला अत्यल्प भाव दिला असला तरी शेतकऱ्यांनी कामातील उत्साह सोडविला नाही. कापूस पीक आता फुलू लागले आहे. सीतादई करून वेचणीला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. पेरणीपासून कापूस फुटेपर्यंत शेतकऱ्यांनी जीवापाड पीक जपले. कापसासारखे नगदी पीक घरी आणताना शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या उत्साहाला धार्मिकतेची जोडही मिळते. सीतादई केल्याशिवाय वेचणीला प्रारंभ केला जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा शेतकरी आजही पाळत आहे. अनेक ठिकाणी पऱ्हाटीला बोंड फुटू लागले आहे. ही सुगीची चाहुल शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरली आहे. सीतादईचा विधी अनेक शेतांमध्ये सध्या दिसून येत आहे. अत्यल्प भाव, नैसर्गिक संकटे यांचा सामना करीत दरवर्षी कापसाचे पीक घेतले जात आहे. वेचणीला प्रारंभ झाला असला तरी पणन महासंघाचे भाव मात्र अत्यल्प आहे. ते भाव शासनाने वाढवावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. सोयाबीनवर आतापर्यंत झालेला खर्चही निघण्याची शक्यता कमी आहे. यावर्षी जिल्ह्यात कापसाचा ६० टक्के पेरा आहे. परंतु बाजारभाव पाहता कापूस विकताना तो सावकाराला द्यावा की सरकारला विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांची फरफट थांबणार आहे. कापूस पणन महासंघाने अद्यापही शासकीय खरेदीची तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. पणन महासंघाने वेळकाढू धोरण बाजूला ठेऊन खरेदीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)