शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

सीतादईने कापूस वेचणीला सुरुवात

By admin | Updated: October 9, 2015 00:29 IST

यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले.

हिवरी : यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले. आता सीतादई करून शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजे कापूस. केंद्र व राज्य सरकारने कापसाला अत्यल्प भाव दिला असला तरी शेतकऱ्यांनी कामातील उत्साह सोडविला नाही. कापूस पीक आता फुलू लागले आहे. सीतादई करून वेचणीला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. पेरणीपासून कापूस फुटेपर्यंत शेतकऱ्यांनी जीवापाड पीक जपले. कापसासारखे नगदी पीक घरी आणताना शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या उत्साहाला धार्मिकतेची जोडही मिळते. सीतादई केल्याशिवाय वेचणीला प्रारंभ केला जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा शेतकरी आजही पाळत आहे. अनेक ठिकाणी पऱ्हाटीला बोंड फुटू लागले आहे. ही सुगीची चाहुल शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरली आहे. सीतादईचा विधी अनेक शेतांमध्ये सध्या दिसून येत आहे. अत्यल्प भाव, नैसर्गिक संकटे यांचा सामना करीत दरवर्षी कापसाचे पीक घेतले जात आहे. वेचणीला प्रारंभ झाला असला तरी पणन महासंघाचे भाव मात्र अत्यल्प आहे. ते भाव शासनाने वाढवावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. सोयाबीनवर आतापर्यंत झालेला खर्चही निघण्याची शक्यता कमी आहे. यावर्षी जिल्ह्यात कापसाचा ६० टक्के पेरा आहे. परंतु बाजारभाव पाहता कापूस विकताना तो सावकाराला द्यावा की सरकारला विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांची फरफट थांबणार आहे. कापूस पणन महासंघाने अद्यापही शासकीय खरेदीची तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. पणन महासंघाने वेळकाढू धोरण बाजूला ठेऊन खरेदीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)