शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सीतादईने कापूस वेचणीला सुरुवात

By admin | Updated: October 9, 2015 00:29 IST

यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले.

हिवरी : यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले. आता सीतादई करून शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजे कापूस. केंद्र व राज्य सरकारने कापसाला अत्यल्प भाव दिला असला तरी शेतकऱ्यांनी कामातील उत्साह सोडविला नाही. कापूस पीक आता फुलू लागले आहे. सीतादई करून वेचणीला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. पेरणीपासून कापूस फुटेपर्यंत शेतकऱ्यांनी जीवापाड पीक जपले. कापसासारखे नगदी पीक घरी आणताना शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या उत्साहाला धार्मिकतेची जोडही मिळते. सीतादई केल्याशिवाय वेचणीला प्रारंभ केला जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा शेतकरी आजही पाळत आहे. अनेक ठिकाणी पऱ्हाटीला बोंड फुटू लागले आहे. ही सुगीची चाहुल शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरली आहे. सीतादईचा विधी अनेक शेतांमध्ये सध्या दिसून येत आहे. अत्यल्प भाव, नैसर्गिक संकटे यांचा सामना करीत दरवर्षी कापसाचे पीक घेतले जात आहे. वेचणीला प्रारंभ झाला असला तरी पणन महासंघाचे भाव मात्र अत्यल्प आहे. ते भाव शासनाने वाढवावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. सोयाबीनवर आतापर्यंत झालेला खर्चही निघण्याची शक्यता कमी आहे. यावर्षी जिल्ह्यात कापसाचा ६० टक्के पेरा आहे. परंतु बाजारभाव पाहता कापूस विकताना तो सावकाराला द्यावा की सरकारला विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांची फरफट थांबणार आहे. कापूस पणन महासंघाने अद्यापही शासकीय खरेदीची तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. पणन महासंघाने वेळकाढू धोरण बाजूला ठेऊन खरेदीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)