शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

एकाच बैलावर शेतमशागतीची साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:47 IST

शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे.

ठळक मुद्देऐपत नसल्याने शोधला मार्ग : दरवर्षी दहा एकर कसतो शेती, मुकिंदपूरच्या परसरामच्या कष्टाला नावीण्यतेची जोड

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे. एक बैल नसताना एका बैलाच्या भरोशावरच शेतीच्या मशागतीची कामे तो करत आहे. बैलासोबत स्वत: राबून त्याने शेतमाळ फुलविले आहे.आर्णी तालुक्यातील मुकींदपुर गाव पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल आडवळणावरील गाव. शेतीव्यतिरिक्त मासेमारी या गावातील मुख्य व्यवसाय. परसराम मेश्राम यांच्याकडे चार एकर शेती आहे. नदी लागून असल्याने दुसऱ्यांचेही शेत त्याने भाड्याने केले आहे. जमेल तेवढे सिंचन करून उत्पन्न वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा शेतकरी करत आहे. मात्र निसर्गाच्या संकटांनी नापिकीच वाट्याला आली आहे. या विपरीत स्थितीत मोठा आघात झाला. या बैलजोडीच्या जीवावर शेतीचा गाडा सुरू होता त्यातील तरणाबांड बैल अचानक मरण पावला. ऐन पेरणीच्या तोंडावर बी-बियाण्याची तजवीज करताना बैल खरेदी करणे शक्य झाले नाही. २००७ पासून आजतागायत परसरामला बैलाला जोड घेता आला नाही. या संकटावर मात करण्यासाठी त्याने स्वत:च खांद्यावर जू घेतले. काही दिवस हा प्रयोग केला. मात्र शारीरिक मर्यादेपुढे जमले नाही. त्यानंतर एका बैलावरच मशागतीचे व शेतीची इतर कामे करता येईल अशा स्वरूपाची अवजारे घरीच तयार केली. नागर, वखर, डवरा यासारखी मशागतीची साधने एका बैलावर चालविण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.२५ मे २००७ पासून एकाच बैलावर शेतीतील कामे सुरू असून वखरणे, डवरणे, पेरणे, बैलबंडी हाकलले ही कामे केली जात आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. शेतीतील रुची वाढत गेली.एकाही शासकीय योजनेचा लाभ नाहीशासन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. उमद्या शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचतच नाही. कृषी विभागातील भ्रष्ट यंत्रणा वशीलेबाजांनाच योजनेचे घबाड देते. शासनाच्या योजनेसाठी शेतीसोडून तालुक्याला येरझारा घालणे न परवडणारे आहे. त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याने कधीच शासकीय योजनेचा नाद केला नाही, असे परसराम पांडुरंग मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.