शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

एकाच बैलावर शेतमशागतीची साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:47 IST

शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे.

ठळक मुद्देऐपत नसल्याने शोधला मार्ग : दरवर्षी दहा एकर कसतो शेती, मुकिंदपूरच्या परसरामच्या कष्टाला नावीण्यतेची जोड

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे. एक बैल नसताना एका बैलाच्या भरोशावरच शेतीच्या मशागतीची कामे तो करत आहे. बैलासोबत स्वत: राबून त्याने शेतमाळ फुलविले आहे.आर्णी तालुक्यातील मुकींदपुर गाव पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल आडवळणावरील गाव. शेतीव्यतिरिक्त मासेमारी या गावातील मुख्य व्यवसाय. परसराम मेश्राम यांच्याकडे चार एकर शेती आहे. नदी लागून असल्याने दुसऱ्यांचेही शेत त्याने भाड्याने केले आहे. जमेल तेवढे सिंचन करून उत्पन्न वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा शेतकरी करत आहे. मात्र निसर्गाच्या संकटांनी नापिकीच वाट्याला आली आहे. या विपरीत स्थितीत मोठा आघात झाला. या बैलजोडीच्या जीवावर शेतीचा गाडा सुरू होता त्यातील तरणाबांड बैल अचानक मरण पावला. ऐन पेरणीच्या तोंडावर बी-बियाण्याची तजवीज करताना बैल खरेदी करणे शक्य झाले नाही. २००७ पासून आजतागायत परसरामला बैलाला जोड घेता आला नाही. या संकटावर मात करण्यासाठी त्याने स्वत:च खांद्यावर जू घेतले. काही दिवस हा प्रयोग केला. मात्र शारीरिक मर्यादेपुढे जमले नाही. त्यानंतर एका बैलावरच मशागतीचे व शेतीची इतर कामे करता येईल अशा स्वरूपाची अवजारे घरीच तयार केली. नागर, वखर, डवरा यासारखी मशागतीची साधने एका बैलावर चालविण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.२५ मे २००७ पासून एकाच बैलावर शेतीतील कामे सुरू असून वखरणे, डवरणे, पेरणे, बैलबंडी हाकलले ही कामे केली जात आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. शेतीतील रुची वाढत गेली.एकाही शासकीय योजनेचा लाभ नाहीशासन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. उमद्या शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचतच नाही. कृषी विभागातील भ्रष्ट यंत्रणा वशीलेबाजांनाच योजनेचे घबाड देते. शासनाच्या योजनेसाठी शेतीसोडून तालुक्याला येरझारा घालणे न परवडणारे आहे. त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याने कधीच शासकीय योजनेचा नाद केला नाही, असे परसराम पांडुरंग मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.