शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एकाच बैलावर शेतमशागतीची साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:47 IST

शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे.

ठळक मुद्देऐपत नसल्याने शोधला मार्ग : दरवर्षी दहा एकर कसतो शेती, मुकिंदपूरच्या परसरामच्या कष्टाला नावीण्यतेची जोड

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे. एक बैल नसताना एका बैलाच्या भरोशावरच शेतीच्या मशागतीची कामे तो करत आहे. बैलासोबत स्वत: राबून त्याने शेतमाळ फुलविले आहे.आर्णी तालुक्यातील मुकींदपुर गाव पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल आडवळणावरील गाव. शेतीव्यतिरिक्त मासेमारी या गावातील मुख्य व्यवसाय. परसराम मेश्राम यांच्याकडे चार एकर शेती आहे. नदी लागून असल्याने दुसऱ्यांचेही शेत त्याने भाड्याने केले आहे. जमेल तेवढे सिंचन करून उत्पन्न वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा शेतकरी करत आहे. मात्र निसर्गाच्या संकटांनी नापिकीच वाट्याला आली आहे. या विपरीत स्थितीत मोठा आघात झाला. या बैलजोडीच्या जीवावर शेतीचा गाडा सुरू होता त्यातील तरणाबांड बैल अचानक मरण पावला. ऐन पेरणीच्या तोंडावर बी-बियाण्याची तजवीज करताना बैल खरेदी करणे शक्य झाले नाही. २००७ पासून आजतागायत परसरामला बैलाला जोड घेता आला नाही. या संकटावर मात करण्यासाठी त्याने स्वत:च खांद्यावर जू घेतले. काही दिवस हा प्रयोग केला. मात्र शारीरिक मर्यादेपुढे जमले नाही. त्यानंतर एका बैलावरच मशागतीचे व शेतीची इतर कामे करता येईल अशा स्वरूपाची अवजारे घरीच तयार केली. नागर, वखर, डवरा यासारखी मशागतीची साधने एका बैलावर चालविण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.२५ मे २००७ पासून एकाच बैलावर शेतीतील कामे सुरू असून वखरणे, डवरणे, पेरणे, बैलबंडी हाकलले ही कामे केली जात आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. शेतीतील रुची वाढत गेली.एकाही शासकीय योजनेचा लाभ नाहीशासन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. उमद्या शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचतच नाही. कृषी विभागातील भ्रष्ट यंत्रणा वशीलेबाजांनाच योजनेचे घबाड देते. शासनाच्या योजनेसाठी शेतीसोडून तालुक्याला येरझारा घालणे न परवडणारे आहे. त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याने कधीच शासकीय योजनेचा नाद केला नाही, असे परसराम पांडुरंग मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.