शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

चिलगव्हाणचा चिरेबंदी वाडा नि:शब्द

By admin | Updated: March 16, 2017 01:00 IST

सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा.

रविवारी अन्नत्याग : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचे भयाण वास्तव संजय भगत   महागाव सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा. तब्बल ३१ वर्षांपूर्वी या वाड्याच्या मालकाने केलेली आत्महत्या राज्यातील पहिली ठरली. रविवारी या वाड्यासमोर काळी रांगोळी काढून अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. परंतु ज्या वाड्यापुढे आंदोलन होणार आहे, त्या कुटुंबाचा कोणीही वारसदार असू नये, हेच या वाड्याचे भयान वास्तव होय. महागाव तालुक्यातील चिलवाडी येथील साहेबराव करपे या भूमिपुत्राने ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च रोजी पवनार येथे पत्नी मालता, मुलगा श्रीकांत, मुलगी सारिका, मंगला आणि विश्रांती या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. या शेतकऱ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेतकरी नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वात एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन १९ मार्च रोजी संपूर्ण राज्यात केले जात आहे, तर साहेबराव पाटलांच्या या चिरेबंदीवाड्यापुढेही गावकरी आंदोलन करणार आहे. या अन्नत्याग आंदोलनामुळे साहेबराव पाटलांचा तो चिरेबंदीवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चिलगव्हाण हे पुसद-माहूर रस्त्यावरील गाव. शीप नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात जमीनदार साहेबराव पाटील यांचा चिरेबंदीवाडा आहे. एकरभर जागेत उभारलेला हा वाडा आजही बुलंद असला तरी त्याचा मालक मात्र आज या जगात नाही. साहेबराव पाटील यांच्याकडे वंशपरंपरागत जमीन होती. शेतीत प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. साहेबराव १५ वर्षे गावचे अविरोध सरपंच होते. सत्यासाठी झटणारा हा माणूस शेती आणि संगीताचा चाहता होता. काळ्या मातीशी इमान राखून असलेल्या साहेबराव पाटलांनी हिस्से वाटणीनंतर आपल्या वाट्यावर आलेल्या जमिनीत विविध प्रयोग केले. परंतु त्यांना आलेले नैराश्य किती काळोख असू शकते, याची कल्पनाच करवत नाही. ३१ वर्षानंतर चिलगव्हाण येथील जमीनदार असलेल्या कुटुंबाचे आता येथे काहीच अस्तित्व शिल्लक नाही. वाडा विकला गेला. गुंठाभर जमीनही शिल्लक नाही. पाठचा भाऊ तोही गावसोडून इतरत्र वास्तव्याला आहे. आज हा चिरेबंदीवाडा तेवढी पाटील कुटुंबाची साक्ष देते. हा वाडा आता दुसऱ्याच्या मालकीचा असला तरी साहेबरावांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न नवीन मालकानेही केला आहे. चिरेबंदीवाड्यातील प्रत्येक वस्तू साहेबराव पाटलांच्या आठवणीने अश्रू ढाळते. १९ मार्चला पुन्हा या साहेबराव पाटलांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. परंतु त्यावेळी या कुटुंबातील कोणीही नसेल, हे दुर्दैव त्या वाड्याचे की साहेबरावांचे.