शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

चिलगव्हाणचा चिरेबंदी वाडा नि:शब्द

By admin | Updated: March 16, 2017 01:00 IST

सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा.

रविवारी अन्नत्याग : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचे भयाण वास्तव संजय भगत   महागाव सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा. तब्बल ३१ वर्षांपूर्वी या वाड्याच्या मालकाने केलेली आत्महत्या राज्यातील पहिली ठरली. रविवारी या वाड्यासमोर काळी रांगोळी काढून अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. परंतु ज्या वाड्यापुढे आंदोलन होणार आहे, त्या कुटुंबाचा कोणीही वारसदार असू नये, हेच या वाड्याचे भयान वास्तव होय. महागाव तालुक्यातील चिलवाडी येथील साहेबराव करपे या भूमिपुत्राने ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च रोजी पवनार येथे पत्नी मालता, मुलगा श्रीकांत, मुलगी सारिका, मंगला आणि विश्रांती या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. या शेतकऱ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेतकरी नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वात एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन १९ मार्च रोजी संपूर्ण राज्यात केले जात आहे, तर साहेबराव पाटलांच्या या चिरेबंदीवाड्यापुढेही गावकरी आंदोलन करणार आहे. या अन्नत्याग आंदोलनामुळे साहेबराव पाटलांचा तो चिरेबंदीवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चिलगव्हाण हे पुसद-माहूर रस्त्यावरील गाव. शीप नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात जमीनदार साहेबराव पाटील यांचा चिरेबंदीवाडा आहे. एकरभर जागेत उभारलेला हा वाडा आजही बुलंद असला तरी त्याचा मालक मात्र आज या जगात नाही. साहेबराव पाटील यांच्याकडे वंशपरंपरागत जमीन होती. शेतीत प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. साहेबराव १५ वर्षे गावचे अविरोध सरपंच होते. सत्यासाठी झटणारा हा माणूस शेती आणि संगीताचा चाहता होता. काळ्या मातीशी इमान राखून असलेल्या साहेबराव पाटलांनी हिस्से वाटणीनंतर आपल्या वाट्यावर आलेल्या जमिनीत विविध प्रयोग केले. परंतु त्यांना आलेले नैराश्य किती काळोख असू शकते, याची कल्पनाच करवत नाही. ३१ वर्षानंतर चिलगव्हाण येथील जमीनदार असलेल्या कुटुंबाचे आता येथे काहीच अस्तित्व शिल्लक नाही. वाडा विकला गेला. गुंठाभर जमीनही शिल्लक नाही. पाठचा भाऊ तोही गावसोडून इतरत्र वास्तव्याला आहे. आज हा चिरेबंदीवाडा तेवढी पाटील कुटुंबाची साक्ष देते. हा वाडा आता दुसऱ्याच्या मालकीचा असला तरी साहेबरावांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न नवीन मालकानेही केला आहे. चिरेबंदीवाड्यातील प्रत्येक वस्तू साहेबराव पाटलांच्या आठवणीने अश्रू ढाळते. १९ मार्चला पुन्हा या साहेबराव पाटलांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. परंतु त्यावेळी या कुटुंबातील कोणीही नसेल, हे दुर्दैव त्या वाड्याचे की साहेबरावांचे.