शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

चिलगव्हाणचा चिरेबंदी वाडा नि:शब्द

By admin | Updated: March 16, 2017 01:00 IST

सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा.

रविवारी अन्नत्याग : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचे भयाण वास्तव संजय भगत   महागाव सदैव माणसांचा राबता आणि अगत्यासाठी तत्पर असलेला चिलगव्हाणचा चिरेबंदीवाडा संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून नि:शब्द झाला तो कायमचा. तब्बल ३१ वर्षांपूर्वी या वाड्याच्या मालकाने केलेली आत्महत्या राज्यातील पहिली ठरली. रविवारी या वाड्यासमोर काळी रांगोळी काढून अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. परंतु ज्या वाड्यापुढे आंदोलन होणार आहे, त्या कुटुंबाचा कोणीही वारसदार असू नये, हेच या वाड्याचे भयान वास्तव होय. महागाव तालुक्यातील चिलवाडी येथील साहेबराव करपे या भूमिपुत्राने ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च रोजी पवनार येथे पत्नी मालता, मुलगा श्रीकांत, मुलगी सारिका, मंगला आणि विश्रांती या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. या शेतकऱ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेतकरी नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वात एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन १९ मार्च रोजी संपूर्ण राज्यात केले जात आहे, तर साहेबराव पाटलांच्या या चिरेबंदीवाड्यापुढेही गावकरी आंदोलन करणार आहे. या अन्नत्याग आंदोलनामुळे साहेबराव पाटलांचा तो चिरेबंदीवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चिलगव्हाण हे पुसद-माहूर रस्त्यावरील गाव. शीप नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात जमीनदार साहेबराव पाटील यांचा चिरेबंदीवाडा आहे. एकरभर जागेत उभारलेला हा वाडा आजही बुलंद असला तरी त्याचा मालक मात्र आज या जगात नाही. साहेबराव पाटील यांच्याकडे वंशपरंपरागत जमीन होती. शेतीत प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. साहेबराव १५ वर्षे गावचे अविरोध सरपंच होते. सत्यासाठी झटणारा हा माणूस शेती आणि संगीताचा चाहता होता. काळ्या मातीशी इमान राखून असलेल्या साहेबराव पाटलांनी हिस्से वाटणीनंतर आपल्या वाट्यावर आलेल्या जमिनीत विविध प्रयोग केले. परंतु त्यांना आलेले नैराश्य किती काळोख असू शकते, याची कल्पनाच करवत नाही. ३१ वर्षानंतर चिलगव्हाण येथील जमीनदार असलेल्या कुटुंबाचे आता येथे काहीच अस्तित्व शिल्लक नाही. वाडा विकला गेला. गुंठाभर जमीनही शिल्लक नाही. पाठचा भाऊ तोही गावसोडून इतरत्र वास्तव्याला आहे. आज हा चिरेबंदीवाडा तेवढी पाटील कुटुंबाची साक्ष देते. हा वाडा आता दुसऱ्याच्या मालकीचा असला तरी साहेबरावांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न नवीन मालकानेही केला आहे. चिरेबंदीवाड्यातील प्रत्येक वस्तू साहेबराव पाटलांच्या आठवणीने अश्रू ढाळते. १९ मार्चला पुन्हा या साहेबराव पाटलांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. परंतु त्यावेळी या कुटुंबातील कोणीही नसेल, हे दुर्दैव त्या वाड्याचे की साहेबरावांचे.