शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू होऊनही मानव मिशनच्या बसेस बंदच

By admin | Updated: July 9, 2017 00:54 IST

तालुक्यातील शाळा-महाविद्यालय सुरू होऊन आठवडा उलटून गेला. परंतु खेड्यापाड्यातील मुलींना शाळा-महाविद्यालयात

पांढरकवडा आगाराची उदासीनता : तालुक्यातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान, अन्य प्रवाशांसाठी बसेसचा वापर लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : तालुक्यातील शाळा-महाविद्यालय सुरू होऊन आठवडा उलटून गेला. परंतु खेड्यापाड्यातील मुलींना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी दरवर्षी नियमितपणे सोडण्यात येणाऱ्या मानव मिशनच्या बसेस अद्यापही पांढरकवडा आगारातून सोडण्यात आल्या नाही. यामुळे विद्यार्थिनींचे शैैक्षणिकनुकसान होत आहे. ग्रामीण भागातून तालुकास्थळी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी शासनाने मानव मिशनच्या माध्यमातून प्रत्येक आगारात बसेस उपलब्ध करून दिल्या. या गाड्या केवळ पासधारक विद्यार्थिनींसाठी असून या गाड्या दुसऱ्या कोणत्याही मार्गावर धावणार नाही. तसेच विद्यार्थिनींशिवाय कोणतेही प्रवासी या बसमध्ये घेऊ नये, असा शासनाचा दंडक आहे. जिल्ह्याच्या बाहेरही या गाड्या पाठवू नये, असे शासनाचे आदेश आहे. परंतु या गाड्या सर्रासपणे दुसऱ्या मार्गावर प्रवासी भरून जाताना दिसतात. त्यामुळे शासनाने ज्या उद्देशाने या गाड्याएस.टी.आगाराला पुरविल्या, त्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. आगारात मानव मिशनच्या नऊ गाड्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा गेल्या २७ जूनपासून सुरु झाल्या. शाळा सुरू होऊन १० दिवस उलटून गेले. परंतु अजुनही विद्यार्थिनींसाठी असलेल्या या मानव मिशनच्या गाड्या अद्यापही शेड्युलप्रमाणे सोडल्या नाही. खेड्यापाड्यातील मुली व त्यांचे पालक दररोज पांढरकवडा एस.टी. आगारात येऊन गाड्या सुरु करा म्हणून विनवणी करीत आहे. परंतु त्यांचे कोणीही ऐकायला तयार नाही. कोणतीही कारणे सांगून त्यांना परत पाठविले जाते. एस.टी.च्या एका कर्मचाऱ्याने तर या गाड्या चक्क पंढरपुरला गेल्या असून या गाड्या परत आल्यानंतर दररोज नियमितपणे सोडण्यात येईल, असे सांगून टाकले. पांढरकवडा ते पिंपळखुटी, पांढरकवडा ते करणवाडी, पांढरकवडा ते पाटण एदलापूर(धानोरा) या शिवाय वाई मार्गावर या मानव मिशनच्या गाड्या सुरु होत्या. या मार्गावरील ढोकी, सुन्ना, कोपा मांडवी तसेच सोनबर्डी, मारेगाव, वाघोली, तांडा, करणवाडी याशिवाय मार्गातील अनेक गावातील मुली या गाड्यांनी मोफत पासव्दारे जाणे येणे करीत होत्या. परंतु या सत्रात या गाड्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्या-येण्यासाठी अद्यापही सुरु केल्या नाही. त्यामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गाड्या केवळ शाळेतील विद्यार्थिनींसाठीच असुनसुध्दा सर्रास नागपुर, अमरावती या मार्गावर प्रवासी भरुन पाठविल्या जात आहे.