शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू होऊनही मानव मिशनच्या बसेस बंदच

By admin | Updated: July 9, 2017 00:54 IST

तालुक्यातील शाळा-महाविद्यालय सुरू होऊन आठवडा उलटून गेला. परंतु खेड्यापाड्यातील मुलींना शाळा-महाविद्यालयात

पांढरकवडा आगाराची उदासीनता : तालुक्यातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान, अन्य प्रवाशांसाठी बसेसचा वापर लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : तालुक्यातील शाळा-महाविद्यालय सुरू होऊन आठवडा उलटून गेला. परंतु खेड्यापाड्यातील मुलींना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी दरवर्षी नियमितपणे सोडण्यात येणाऱ्या मानव मिशनच्या बसेस अद्यापही पांढरकवडा आगारातून सोडण्यात आल्या नाही. यामुळे विद्यार्थिनींचे शैैक्षणिकनुकसान होत आहे. ग्रामीण भागातून तालुकास्थळी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी शासनाने मानव मिशनच्या माध्यमातून प्रत्येक आगारात बसेस उपलब्ध करून दिल्या. या गाड्या केवळ पासधारक विद्यार्थिनींसाठी असून या गाड्या दुसऱ्या कोणत्याही मार्गावर धावणार नाही. तसेच विद्यार्थिनींशिवाय कोणतेही प्रवासी या बसमध्ये घेऊ नये, असा शासनाचा दंडक आहे. जिल्ह्याच्या बाहेरही या गाड्या पाठवू नये, असे शासनाचे आदेश आहे. परंतु या गाड्या सर्रासपणे दुसऱ्या मार्गावर प्रवासी भरून जाताना दिसतात. त्यामुळे शासनाने ज्या उद्देशाने या गाड्याएस.टी.आगाराला पुरविल्या, त्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. आगारात मानव मिशनच्या नऊ गाड्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा गेल्या २७ जूनपासून सुरु झाल्या. शाळा सुरू होऊन १० दिवस उलटून गेले. परंतु अजुनही विद्यार्थिनींसाठी असलेल्या या मानव मिशनच्या गाड्या अद्यापही शेड्युलप्रमाणे सोडल्या नाही. खेड्यापाड्यातील मुली व त्यांचे पालक दररोज पांढरकवडा एस.टी. आगारात येऊन गाड्या सुरु करा म्हणून विनवणी करीत आहे. परंतु त्यांचे कोणीही ऐकायला तयार नाही. कोणतीही कारणे सांगून त्यांना परत पाठविले जाते. एस.टी.च्या एका कर्मचाऱ्याने तर या गाड्या चक्क पंढरपुरला गेल्या असून या गाड्या परत आल्यानंतर दररोज नियमितपणे सोडण्यात येईल, असे सांगून टाकले. पांढरकवडा ते पिंपळखुटी, पांढरकवडा ते करणवाडी, पांढरकवडा ते पाटण एदलापूर(धानोरा) या शिवाय वाई मार्गावर या मानव मिशनच्या गाड्या सुरु होत्या. या मार्गावरील ढोकी, सुन्ना, कोपा मांडवी तसेच सोनबर्डी, मारेगाव, वाघोली, तांडा, करणवाडी याशिवाय मार्गातील अनेक गावातील मुली या गाड्यांनी मोफत पासव्दारे जाणे येणे करीत होत्या. परंतु या सत्रात या गाड्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्या-येण्यासाठी अद्यापही सुरु केल्या नाही. त्यामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गाड्या केवळ शाळेतील विद्यार्थिनींसाठीच असुनसुध्दा सर्रास नागपुर, अमरावती या मार्गावर प्रवासी भरुन पाठविल्या जात आहे.