शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पहिल्याच दिवशी आठ कर्मचाऱ्यांना शोकाॅज नोटीस; नव्या मुख्याधिकाऱ्यांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2023 19:32 IST

पदभार स्वीकारताच कामाला झाली सुरुवात

प्रकाश सातघरे

दिग्रस (यवतमाळ) : नव्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नगरपालिकेची सूत्रे स्वीकारली. पहिल्याच दिवशी त्यांनी दांडीबहाद्दर आठ कर्मचाऱ्यांना शोकाॅज नोटीस बजावून कामकाजाला सुरुवात केली. नागरिकांच्या सहकार्याने दिग्रस शहराचा कायापालट करून स्वच्छ व सुंदर शहर बनविणार असल्याचे मुख्याधिकारी मडावी यांनी सांगितले.

नव्या मुख्याधिकाऱ्यांनी दाखल होताच आठ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याने कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी परवानगीविना रजेवर गेलेल्या आठ कर्मचाऱ्यांना मडावी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली. यवतमाळ नगरपालिकेत मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून कार्यरत असताना माधुरी मडावी यांनी आपल्या कार्याची छाप उमटविली होती. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच त्या जिल्ह्यात परिचित झाल्या होत्या. मडावी यांनी यवतमाळ नगरपालिकेत मुख्याधिकारी असताना अनेक धाडसी निर्णय घेतले. स्वच्छता, अतिक्रमण, नागरिकांच्या तक्रारी, आदी प्रमुख विषयांना प्राधान्य दिले.

नागपूर, अकोला, यवतमाळ येथे कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली होती. दरम्यान, शासनाने त्यांची दिग्रस मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी दिग्रस नगरपालिकेत मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. शहराचा विकास साधायचा असेल तर सुरुवात कार्यालयापासून करावी लागते. कार्यालयात स्वच्छतेचा अभाव, वॉशरूम व इतर ठिकाणचे खिळखिळे दरवाजे आणि विनापरवानगीने आठ कर्मचारी रजेवर गेल्याची बाब मुख्याधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतली. यावेळी रजेवरील आठ कर्मचाऱ्यांना शोकॉज बजावल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. दिग्रस शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दिग्रस शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले.

१५ वर्षांत १७ ठिकाणी बदलीआपल्या १५ वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीत ही १७ वी बदली असल्याचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले. शहर सुंदर आणि स्वच्छ करायचे असेल, शहराचा कायापालट करायचा असेल तर नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले.