शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

धडक सिंचन विहिरी रखडल्या, हिरवे स्वप्न भंग

By admin | Updated: May 24, 2014 23:59 IST

शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत.

वणी : शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत. परिणामी शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्नच करपत आहे.

पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ात सतत शेतकरी आत्महत्या होत आहे. त्यासाठी कोरडवाहू शेती कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने या पाचही जिल्हय़ात कोरडवाहू शेती केली जाते. ही शेती केवळ निसर्गाच्या पावसावर अवलंबून असते. मात्र लहरी पावसामुळे कोरडवाहू शेती बिनभरवशाची झाली आहे. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओल्या दुष्काळामुळेही या पाचही जिल्हय़ातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचा निष्कर्ष काढून शासनाने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पाचही आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांकरिता विशेष पॅकेज देण्यात आले. या पॅकेजच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजना तयार करण्यात आल्या. त्यात विविध योजनांसाठी भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आली. मात्र या योजनांचा लाभ अद्यापही प्रत्यक्षात अनेक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे अजूनही जिल्हय़ात शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.

शासनाने कोरडवाहू शेतीवर मात करून शेतकर्‍यांना सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी याच पॅकेज अंतर्गत धडक सिंचन विहिरींची योजना आखली. यात अल्प, अत्यल्प आणि अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकर्‍यांना १00 टक्के अनुदानावर विहिरी बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्याव्दारे ओलिताची सुविधा निर्माण होईल, असा कयास होता. परिणामी लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून कुणावरही आत्महत्येसारखा प्रसंग ओढवणार नाही, अशी अपेक्षा होती. शासनाचा हेतू अत्यंत चांगला होता. मात्र योजना राबविताना आता सर्वांंची प्रचंड दमछाक होत आहे.

वणी तालुक्यात तालुका कृषी विभागातर्फे धडक सिंचन विहिरी योजनेतून तब्बल १९३ शेतकर्‍यांना विहीर मंजूर झाली होती. त्यापैकी आजमितीस केवळ १३ विहिरींचे काम पूर्ण झाले. सात विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित १७३ विहिरींचे काम अद्याप अपूर्णच आहे. विहिरींचे काम रखडण्यास शासनासोबतच संबंधित शेतकरीही जबाबदार दिसून येत आहे. शासन आणि शेतकरी या दोघांनीही शेतात विहिरी खोदकामासाठी आवश्यक तो पुढाकार घेतलाच नाही.

शेतात विहिरी खोदकामासाठी जोमाने प्रयत्न न झाल्याने तालुक्यातील १७३ शेतकर्‍यांच्या शेतात अद्याप विहीर पूर्ण झालीच नाही. अनेकांनी तर अजूनही विहिरीचे खोदकामच सुरू केले नसावे. त्यामुळे ही धडक सिंचन विहिरी योजनाच आता वांद्यात सापडली आहे. त्यातील अटींमुळे शेतकरीही चांगलेच त्रस्त झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)