शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरी रखडल्या, हिरवे स्वप्न भंग

By admin | Updated: May 24, 2014 23:59 IST

शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत.

वणी : शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत. परिणामी शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्नच करपत आहे.

पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ात सतत शेतकरी आत्महत्या होत आहे. त्यासाठी कोरडवाहू शेती कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने या पाचही जिल्हय़ात कोरडवाहू शेती केली जाते. ही शेती केवळ निसर्गाच्या पावसावर अवलंबून असते. मात्र लहरी पावसामुळे कोरडवाहू शेती बिनभरवशाची झाली आहे. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओल्या दुष्काळामुळेही या पाचही जिल्हय़ातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचा निष्कर्ष काढून शासनाने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पाचही आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांकरिता विशेष पॅकेज देण्यात आले. या पॅकेजच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजना तयार करण्यात आल्या. त्यात विविध योजनांसाठी भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आली. मात्र या योजनांचा लाभ अद्यापही प्रत्यक्षात अनेक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे अजूनही जिल्हय़ात शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.

शासनाने कोरडवाहू शेतीवर मात करून शेतकर्‍यांना सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी याच पॅकेज अंतर्गत धडक सिंचन विहिरींची योजना आखली. यात अल्प, अत्यल्प आणि अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकर्‍यांना १00 टक्के अनुदानावर विहिरी बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्याव्दारे ओलिताची सुविधा निर्माण होईल, असा कयास होता. परिणामी लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून कुणावरही आत्महत्येसारखा प्रसंग ओढवणार नाही, अशी अपेक्षा होती. शासनाचा हेतू अत्यंत चांगला होता. मात्र योजना राबविताना आता सर्वांंची प्रचंड दमछाक होत आहे.

वणी तालुक्यात तालुका कृषी विभागातर्फे धडक सिंचन विहिरी योजनेतून तब्बल १९३ शेतकर्‍यांना विहीर मंजूर झाली होती. त्यापैकी आजमितीस केवळ १३ विहिरींचे काम पूर्ण झाले. सात विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित १७३ विहिरींचे काम अद्याप अपूर्णच आहे. विहिरींचे काम रखडण्यास शासनासोबतच संबंधित शेतकरीही जबाबदार दिसून येत आहे. शासन आणि शेतकरी या दोघांनीही शेतात विहिरी खोदकामासाठी आवश्यक तो पुढाकार घेतलाच नाही.

शेतात विहिरी खोदकामासाठी जोमाने प्रयत्न न झाल्याने तालुक्यातील १७३ शेतकर्‍यांच्या शेतात अद्याप विहीर पूर्ण झालीच नाही. अनेकांनी तर अजूनही विहिरीचे खोदकामच सुरू केले नसावे. त्यामुळे ही धडक सिंचन विहिरी योजनाच आता वांद्यात सापडली आहे. त्यातील अटींमुळे शेतकरीही चांगलेच त्रस्त झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)