शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

२३ हजार हेक्टरातील पिकाला शॉक

By admin | Updated: August 16, 2014 23:42 IST

विहिरीवरून सिंचन करून पीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने २३ हजार हेक्टरवरचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना

कमी दाबाची वीज : सिंचनाची साधने ठरताहेत कुचकामीयवतमाळ : विहिरीवरून सिंचन करून पीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने २३ हजार हेक्टरवरचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने शॉक दिला आहे. कोरडवाहू शेतकरी पर्याय नसल्यामुळे गप्प आहे. मात्र ज्यांच्याकडे पाणी आणि सिंचनाची साधने आहेत, असाही शेतकरी आता हतबल झाला आहे. सातत्याने शेतकऱ्यांवर आघात होत आहे. यापूर्वी अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. अशाही परिस्थितीतून बाहेर पडत मोठ्या उमेदीने खरिपाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. मात्र आता पाऊस नसल्याने बहरलेले पीक करपण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी झाली असून यामध्ये आठ लाख ६९ हजार ४२३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. चार लाख ४१ हजार ७४५ हेक्टरवर कापूस, दोन लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीन, चार हजार २७७ हेक्टरवर भाजीपाला, २६ हजार ८३७ हेक्टरवर ज्वारी, दोन हजार ३०९ हेक्टरवर मका, ८९ हजार २५७ हेक्टरवर तुरीची पेरणी केली आहे. दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊसच आलेला नाही. मुळात सुरुवातीला अतिशय कमी पाऊस झाला. मात्र अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. काही ठिकाणी अल्पशा पावसावरच सोयाबीनचे पीक फुलावरसुद्धा आले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत ठिबक सिंचनाद्वारे कापसाची लागवड केली. या दुष्काळी स्थितीत ठिबक सिंचनातून पाण्याचे नियोजन करता येईल, अशा आशेने शेतकऱ्यांनी यात गुंतवणूक केली. शासनाच्या सबसिडीची वाट न पाहता कर्जाऊ रक्कम घेऊन शेतात ठिबक संच बसविला. आता मात्र पाणी असूनही ते पिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण दाबाची वीज मिळत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन निकामी ठरत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहे. त्यामुळे आता कृषी पंपांची संख्याही वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने जास्त अश्वशक्तीच्या मोटारी बसविल्या आहे. वीज कंपनीकडून कनेक्शन घेताना तीन एचपीच्या मोटारीसाठी घेतले. प्रत्यक्षात मात्र त्यावर पाच ते सात एचपीचा पंप चालविण्यात येतो. त्यामुळे विजेचा दाब पुरेशा प्रमाणात मिळत नाही. परिणामी मोटारपंप लाईन असूनही फिरत नाही. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी मोटारीवर आॅटोस्वीच बसविले आहे. भारनियमनानंतर लाईन येताच एकाच वेळी सर्व पंप सुरू होता. अचानक त्या ट्रान्सफार्मरवर दाब वाढतो. यामुळे अनेक पंप चालत नाही. भारनियमन नसले तरी शेतकऱ्यांना कमी दाबाची वीज मिळत असल्याने सिंचन करता येत नाही. वीज वितरण कंपनीने प्रत्यक्ष सर्वे करून ज्या ठिकाणी अतिरिक्त एचपीचे पंप बसविले, अशांवर कारवाई करावी शिवाय शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज मिळेल, असे ट्रान्सफार्मर उपलब्ध करून द्यावे तरच या दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना आपले पीक वाचविणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार तगादा लावल्यानंतरही वीज कंपनी कोणतीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळे सिंचन सुविधा असलेलेही पीक धोक्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)