शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या कारभारावर शिवसेनेने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:27 IST

संपूर्ण यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच कृत्रिमही आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुक्रवारी जलसेवेच्या लोकार्पण प्रसंगी केला.

ठळक मुद्देशहरातील पाणी टंचाई कृत्रिम : शिवसेनेतर्फे २८ टँकरच्या जलवाहिनी सेवेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच कृत्रिमही आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुक्रवारी जलसेवेच्या लोकार्पण प्रसंगी केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. तर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या स्वनिधीतून २८ टँकरद्वारे दररोज पाणी पुरविले जाणार आहे, अशी घोषणा करण्यात आली.शिवाजी मैदानावर शिवसेनेच्या वतीने जलसेवेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, सुजित मुनगीनवार, शहरप्रमुख नितीन बांगर, किशोर इंगळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड, नगरसेवक गजानन इंगोले, किशोर इंगळे उपस्थित होते.शिवसैनिकांनी पाणी पुरवठ्यासाठी झोकून काम करावे, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले. जिल्हाप्रमुखांनी भाजपाच्या कामकाजाचा खरपूस समाचार घेतला. विरोध करून यवतमाळकरांच्या अडचणी वाढविण्यात आल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला. तर पाणी प्रश्न पेटण्यामागे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप पराग पिंगळे यांनी केला. विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी जलसंकट कृत्रिम असल्याचा आरोप केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले.‘अमृत’च्या कामात गैरप्रकारयावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी सध्या सुरू असलेले अमृत योजनेचे कामकाज निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला. इतक्या मोठ्या योजनेसाठी प्रभारी अधिकाऱ्यांवर काम दिले. त्यामुळे यामागे नक्कीच संगनमत असावे, असे ते म्हणाले. नगराध्यक्ष कांचनताई चौधरी म्हणाल्या, अमृत योजना केंद्राची आहे. त्यात कोणी एकट्याने श्रेय लाटणे चुकीचे आहे. याचवेळी त्यांनी नगरपरिषदेतील भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांकडून येणाºया अडचणींचाही उल्लेख केला.