शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भाजपाच्या कारभारावर शिवसेनेने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:27 IST

संपूर्ण यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच कृत्रिमही आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुक्रवारी जलसेवेच्या लोकार्पण प्रसंगी केला.

ठळक मुद्देशहरातील पाणी टंचाई कृत्रिम : शिवसेनेतर्फे २८ टँकरच्या जलवाहिनी सेवेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच कृत्रिमही आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुक्रवारी जलसेवेच्या लोकार्पण प्रसंगी केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. तर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या स्वनिधीतून २८ टँकरद्वारे दररोज पाणी पुरविले जाणार आहे, अशी घोषणा करण्यात आली.शिवाजी मैदानावर शिवसेनेच्या वतीने जलसेवेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, सुजित मुनगीनवार, शहरप्रमुख नितीन बांगर, किशोर इंगळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड, नगरसेवक गजानन इंगोले, किशोर इंगळे उपस्थित होते.शिवसैनिकांनी पाणी पुरवठ्यासाठी झोकून काम करावे, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले. जिल्हाप्रमुखांनी भाजपाच्या कामकाजाचा खरपूस समाचार घेतला. विरोध करून यवतमाळकरांच्या अडचणी वाढविण्यात आल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला. तर पाणी प्रश्न पेटण्यामागे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप पराग पिंगळे यांनी केला. विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी जलसंकट कृत्रिम असल्याचा आरोप केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले.‘अमृत’च्या कामात गैरप्रकारयावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी सध्या सुरू असलेले अमृत योजनेचे कामकाज निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला. इतक्या मोठ्या योजनेसाठी प्रभारी अधिकाऱ्यांवर काम दिले. त्यामुळे यामागे नक्कीच संगनमत असावे, असे ते म्हणाले. नगराध्यक्ष कांचनताई चौधरी म्हणाल्या, अमृत योजना केंद्राची आहे. त्यात कोणी एकट्याने श्रेय लाटणे चुकीचे आहे. याचवेळी त्यांनी नगरपरिषदेतील भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांकडून येणाºया अडचणींचाही उल्लेख केला.