शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

शिवसेनेने उडविला भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीचा फज्जा

By admin | Updated: February 27, 2017 00:52 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने नेर तालुक्यात एकतर्फी विजय संपादन केला.

नेर तालुका : शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना मिळाली संजीवनी नेर : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने नेर तालुक्यात एकतर्फी विजय संपादन केला. भाजपा , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फज्जा उडाल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना संजिवनी मिळाली आहे. एकेकाळी लोकांच्या पसंतीस उतरलेले राजकीय पक्ष आता सहकार क्षेत्रातही माघारले आहेत. विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे, पालकमंत्री मदन येरावार, माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी प्रचारात सक्रिय भाग घेऊनही फायदा होऊ शकला नाही. त्यामुळे या पक्षांवर आत्मचिंतनाची वेळ आली. तालुक्यातील तिनही जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेने विजय मिळविला. या निवडणुकीत पंचायत समितीवरही शिवसेनेने पाच सदस्य निवडून आणून विजयाची हॅट्रीक साधली आहे. शिवसेना नेते बाबू पाटील जैत व रविकिरण राठोड यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले होते. मागील निवडणुकीत राहुल ठाकरे यांनी वटफळी गटात बाबू पाटील जैत यांना पराभूत केले होते. तर मांगलादेवी गटात रविकिरण राठोड यांचा केवळ तीन मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शिवसेनेने पुन्हा बाबू पाटील जैत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचे सुपूत्र निखील जैत यांना वटफळी गटातून तिकीट दिले. तर मांगलादेवी गटात रविकिरण राठोड यांच्या अर्धांगिणीला उमेदवारी दिली. हे दोन्ही उमेदवार निवडून आणत शिवसेनेने आम्ही अजूनही वाघच आहोत हे दाखवून दिले. या जागा पडल्या असत्या तर तयांच्यावर टीकेची झोड उठविली गेली असती. नेर तालुक्यातील मालखेड बु. हा तिसरा आणि महत्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. येथे अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीत राजकीय वारसा नसलेली मावळते पंचायत समिती सभापती भरत मसराम यांनी काँग्रेसच्या हेमंत कोटनाके यांचा पराभव केला. पंचायत समिती जिंकल्यानंतर मसराम यांना जिल्हा परिषदेतही जिंकण्याची संधी मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेलाही अतोनात मेहनत घ्यावी लागली. शिवसेनेच्याच गटातटाने शिवसेनेची गोची करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अस्तित्वाच्या लढाईत गटतट कोलमडले व शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता आली. भाजपाने रिपाई (आ.) गटाला सोबत घेतले. रिपाई गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी आपली सहचारिणी सुलोचनातार्इंना वटफळी गटात रणांगणात उतरविले. मात्र भोयर यांनी बोधचिन्हावर निवडणूक न लढण्याचा घेतलेला निर्णय त्यांना चौथ्या क्रमांकावर घेऊन गेला. एकवेळी शिवसेनेसोबत घट्ट असलेले भोयर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर गेले. यानंतर त्यांनी माणिकराव ठाकरेंशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रसजनांनी ही सलगी अमान्य केली. यामुळेच त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. सक्रिय राजकारणात तालुक्यात नवख्या असलेल्या भाजपासोबत मैत्री करणे भोयर यांना नडले की भाजपाची गोची झाली, यावर सध्य मंथन सुरू आहे. वटफळी गणात बसपाने मारलेली मतांची भरारी शिवसेनेसाठी पोषक ठरली. काँग्रेसचा पराजय बसपाने सोपा केला. वटफळी गणात काँग्रेसने एका चांगल्या व्यक्तिमत्वाला तिकीट दिले, मात्र खुद्द ठाकरे परिवाराने केलेला प्रचारही काँग्रेसचा पराजय टाळू शकला नाही. काँग्रेसचे पुढारी केवळ निवडणुकीच्यावेळी दिसतात इतर वेळी त्यांचे कार्यकर्तेही ढिम्म असतात, हे निकालावरून स्पष्ट होते. काँग्रेसचे गड ३००, ४००, ६०० मतांनी कोसळले. त्यामुळे शिवसेनेपुढे काँग्रेसची ताकद अपुरी पडल्याचे स्पष्ट झाले. (तालुका प्रतिनिधी)