शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
5
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
6
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
7
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
9
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
10
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
11
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
12
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
13
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
14
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
15
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
16
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
17
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
18
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
19
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
Daily Top 2Weekly Top 5

विमा तफावतीने शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:28 IST

विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकºयांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा : खासदारांचे नेतृत्व, जिल्हाभरातील शेतकऱ्यांशी दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.जिल्ह्यात बोंडअळीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना समान मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावून मदत वाटपात तफावत निर्माण केली. या गंभीर बाबीकडे राज्य शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यात अनेक त्रुटी आढळल्या. यामुळे अनेक गावे मदतीमधून वगळली गेली. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली.पीकविमा जाहीर करण्यापूर्वी तलाठी पंचनामे करतात. यामध्ये शेताचे उत्पादन काढण्यात येते. ही प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनाच अंधारात ठेवले जाते. गावातील प्रतिष्ठिताना यावेळी बोलावले जात नाही. ही प्रक्रिया कागदोपत्रीच पार पडते. यामुळे पीकविम्याच्या मदतीत तफावत होते. या प्रकरणात कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कर्जवितरण प्रणाली मंदगतीने काम करीत आहे. बोंडअळीची मदत अनेकांना मिळाली नाही. तुरीचे चुकारे बाकी आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली.निवेदन देतेवेळी खासदार भावना गवळी, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण पांडे, उप जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, उमाकांत पापीनवार, विकास जामकर, दिगांबर मस्के, विनोद काकडे, वसंत जाधव, विक्रम बऱ्हाणपुरे उपस्थित होते.गरज नसताना मागतात सर्च रिपोर्टकर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँका ‘सर्च रिपोर्ट’ मागत आहे. या सर्च रूपोर्टची गरज नसताना पुसदच्या युनियन बँकेने शेतकऱ्यांना मागणी केली. यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केला.पीक कापणीचा विचार व्हावा-भावना गवळीपीक विमा जाहीर करताना पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरला जातो. मात्र हा प्रयोग कुठल्या सर्वेनंबरमध्ये होणार आहे, कुठल्या गावातील शेतकऱ्याची निवड करण्यात आली, याची कुठलीही माहिती गावकºयांना दिली जात नाही. हा प्रयोग केवळ कागदोपत्रीच होतो, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोग विमा कंपनीने जाहीर करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पत्रपरिषदेत केली.