शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

विमा तफावतीने शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:28 IST

विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकºयांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा : खासदारांचे नेतृत्व, जिल्हाभरातील शेतकऱ्यांशी दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.जिल्ह्यात बोंडअळीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना समान मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावून मदत वाटपात तफावत निर्माण केली. या गंभीर बाबीकडे राज्य शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यात अनेक त्रुटी आढळल्या. यामुळे अनेक गावे मदतीमधून वगळली गेली. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली.पीकविमा जाहीर करण्यापूर्वी तलाठी पंचनामे करतात. यामध्ये शेताचे उत्पादन काढण्यात येते. ही प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनाच अंधारात ठेवले जाते. गावातील प्रतिष्ठिताना यावेळी बोलावले जात नाही. ही प्रक्रिया कागदोपत्रीच पार पडते. यामुळे पीकविम्याच्या मदतीत तफावत होते. या प्रकरणात कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कर्जवितरण प्रणाली मंदगतीने काम करीत आहे. बोंडअळीची मदत अनेकांना मिळाली नाही. तुरीचे चुकारे बाकी आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली.निवेदन देतेवेळी खासदार भावना गवळी, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण पांडे, उप जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, उमाकांत पापीनवार, विकास जामकर, दिगांबर मस्के, विनोद काकडे, वसंत जाधव, विक्रम बऱ्हाणपुरे उपस्थित होते.गरज नसताना मागतात सर्च रिपोर्टकर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँका ‘सर्च रिपोर्ट’ मागत आहे. या सर्च रूपोर्टची गरज नसताना पुसदच्या युनियन बँकेने शेतकऱ्यांना मागणी केली. यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केला.पीक कापणीचा विचार व्हावा-भावना गवळीपीक विमा जाहीर करताना पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरला जातो. मात्र हा प्रयोग कुठल्या सर्वेनंबरमध्ये होणार आहे, कुठल्या गावातील शेतकऱ्याची निवड करण्यात आली, याची कुठलीही माहिती गावकºयांना दिली जात नाही. हा प्रयोग केवळ कागदोपत्रीच होतो, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोग विमा कंपनीने जाहीर करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पत्रपरिषदेत केली.