शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक ‘मजीप्रा’वर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:17 IST

यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देखासदारांचे नेतृत्त्व : १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, चार महिन्यांच्या बिलमाफीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. रस्त्यांची ही कामे करताना ठिकठिकाणी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडले आहे. अलिकडेच मार्इंदे चौक परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. हिवाळ्यात रस्त्यावर जणू गंगा वाहू लागली होती. मुख्य वाहिनी फुटल्याने दोन आठवड्यांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन दिवाळीतच पाणी नसल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ होत आहे. पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे.एकीकडे प्रशासन भूगर्भातील पाणीसाठा वाढल्याचे तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असेल तर दरदिवशी नळ का सोडले जात नाही, असा सवाल यवतमाळकर नागरिक विचारत आहे. दरम्यान सोमवारी सकाळीच खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जीवन प्राधिकरणावर धडक देऊन अभियंत्यांना जाब विचारला. चार महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने या काळातील पाणीपुरवठ्याचे संपूर्ण देयक माफ करावे, अशी मागणी भावना गवळी यांनी केली. शहराला तातडीने व नियमित पाणीपुरवठा सुरू करा, शुद्ध पाणी द्या अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी तिसरा पंप सुरू करून आजपासूनच रोटेशननुसार शहराला पाणीपुरवठा सुरू करीत असल्याचे सांगितले. सार्वजनिक नळांमधून पिवळे पाणी येत असले तरी ते आरोग्यास धोकादायक नाही, तातडीने ते शुद्ध करणे शक्य नसल्याचे बेले यांनी स्पष्ट केले. भावना गवळीच्या आंदोलनानंतर दर्डानगर टाकीवरुन त्या भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उप जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, दिगांबर मस्के, तालुका प्रमुख संजय रंगे, विनोद काकडे, वसंत जाधव, नीलेश मैत्रे, यवतमाळ पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठ्याअभावी त्रस्त असलेल्या महिलांचीही संख्या यावेळी अधिक होती.