शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

शिवसैनिक ‘मजीप्रा’वर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:17 IST

यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देखासदारांचे नेतृत्त्व : १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, चार महिन्यांच्या बिलमाफीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. रस्त्यांची ही कामे करताना ठिकठिकाणी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडले आहे. अलिकडेच मार्इंदे चौक परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. हिवाळ्यात रस्त्यावर जणू गंगा वाहू लागली होती. मुख्य वाहिनी फुटल्याने दोन आठवड्यांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन दिवाळीतच पाणी नसल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ होत आहे. पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे.एकीकडे प्रशासन भूगर्भातील पाणीसाठा वाढल्याचे तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असेल तर दरदिवशी नळ का सोडले जात नाही, असा सवाल यवतमाळकर नागरिक विचारत आहे. दरम्यान सोमवारी सकाळीच खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जीवन प्राधिकरणावर धडक देऊन अभियंत्यांना जाब विचारला. चार महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने या काळातील पाणीपुरवठ्याचे संपूर्ण देयक माफ करावे, अशी मागणी भावना गवळी यांनी केली. शहराला तातडीने व नियमित पाणीपुरवठा सुरू करा, शुद्ध पाणी द्या अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी तिसरा पंप सुरू करून आजपासूनच रोटेशननुसार शहराला पाणीपुरवठा सुरू करीत असल्याचे सांगितले. सार्वजनिक नळांमधून पिवळे पाणी येत असले तरी ते आरोग्यास धोकादायक नाही, तातडीने ते शुद्ध करणे शक्य नसल्याचे बेले यांनी स्पष्ट केले. भावना गवळीच्या आंदोलनानंतर दर्डानगर टाकीवरुन त्या भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उप जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, दिगांबर मस्के, तालुका प्रमुख संजय रंगे, विनोद काकडे, वसंत जाधव, नीलेश मैत्रे, यवतमाळ पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठ्याअभावी त्रस्त असलेल्या महिलांचीही संख्या यावेळी अधिक होती.