शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

शिवशाहीत रयत समाधानी होती

By admin | Updated: February 18, 2015 02:17 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रजा समाधानी होती. महिलांचा सन्मान हा प्राधान्याचा विषय होता. त्या काळी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकरी स्वत: ठरवित होता.

दिग्रस : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रजा समाधानी होती. महिलांचा सन्मान हा प्राधान्याचा विषय होता. त्या काळी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकरी स्वत: ठरवित होता. सैनिक किंवा राज्याचा कुणीही अधिकारी शेतकऱ्यांच्या संपत्तीचा गैरवापर करू शकत नव्हता. अशा अनेक प्रजेच्या हितांच्या बाबीचे पालन शिवराज्याच्या काळात होत होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा विचारवंत प्रा.अमोल मिटकरी यांनी केले.ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीद्वारा आयोजित शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ख्वाजा बेग यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र ही परिवर्तनाची भूमी आहे. जागतिक पातळीचे संत, विचारवंत या मातीत जन्माला आले. सारे जग ज्या महाराष्ट्राकडे प्रगतिशील विचारांचे उगमस्थान म्हणून मोठ्या आशेने बघते अशावेळी प्रतिगामी विचारधारा हा प्रगतिशील विचार संपवू पाहात आहे. म्हणून परत छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याची पुनर्स्थापना करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी आपण प्रत्येकाने आपापल्या परिने कार्य केले पाहिजे, असेही प्रा. अमोल मिटकरी म्हणाले. यावेळी सुधीर देशमुख, विठ्ठलराव शिंदे, जावेद पटेल, मिलिंद मानकर, जावेद पहेलवान, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, श्याम पाटील, विवेक वानखडे, सुभाष अटल, कल्पना देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष सीमा शिंदे, राजश्री देशमुख, डॉ.प्रा.अपर्णा पाटील, प्रा.गणवीर, शेषराव गोडवे, मजहर खान, अफजल खान, डॉ.टेवरे, रमाकांत काळे, विलास निकम, सुरेश चिरडे, उद्धव अंबुरे, अशोक गावंडे, दीपक चव्हाण, रामकृष्ण इंगोले आदींसह असंख्य शिवभक्तींची यावेळी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)