शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

एकाच आमदारावर शिवसेनेने मारली बाजी

By admin | Updated: December 6, 2014 02:00 IST

एकाच आमदारावर यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. संजय राठोड यांना अखेर या युती सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद मिळाले.

यवतमाळ : एकाच आमदारावर यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. संजय राठोड यांना अखेर या युती सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद मिळाले. वास्तविक ज्येष्ठ असल्याने त्यांची कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र भविष्यात त्यांना बढती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यात आता भाजपा-सेना महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना संधी दिली गेली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. सन २००४ मध्ये संजय राठोड जुन्या दारव्हा मतदारसंघातून काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांनी आपली ही विजयी घोडदौड सन २००९ आणि आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवली. या निवडणुकीत तर त्यांनी विदर्भातून पहिल्या व महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवित आमदारकीची हॅट्ट्रिक साधली आहे. संजय राठोड गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार असले तरी या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे सलग दोन वेळा निवडून येऊनही त्यांना विरोधी बाकावरच बसावे लागले होते. मात्र गेली १० वर्ष त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून यवतमाळात आणि विरोधी आमदार म्हणून विधानसभेत गाजविले. शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर त्यांनी गेल्या दहा वर्षात अनेक आक्रमक आंदोलने केली. या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडले होते. आता मात्र सत्तेत सहभागी झाल्याने त्यांची ही आंदोलनाची परंपरा किमान पाच वर्ष तरी खंडित होणार आहे. कारण ते स्वत: राज्यमंत्री असल्याने त्यांना थेट जनतेच्या दरबारातून येऊन सरकारविरोधात भूमिका घेता येणार नाही. मात्र राज्यमंत्रीपद मिळाल्याने आमदार संजय राठोड यांच्याकडून दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघातील नागरिकच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहे. जनतेच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहणारे संजय राठोड हे अपेक्षापूर्ती करतील, असा विश्वास मतदारांना आहे. शेती, शेतकरी आणि ग्रामीण समस्यांची असलेली जाण पाहूनच ना.राठोड यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी दिली गेल्याचे मानले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)