शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

एकाच आमदारावर शिवसेनेने मारली बाजी

By admin | Updated: December 6, 2014 02:00 IST

एकाच आमदारावर यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. संजय राठोड यांना अखेर या युती सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद मिळाले.

यवतमाळ : एकाच आमदारावर यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. संजय राठोड यांना अखेर या युती सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद मिळाले. वास्तविक ज्येष्ठ असल्याने त्यांची कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र भविष्यात त्यांना बढती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यात आता भाजपा-सेना महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना संधी दिली गेली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. सन २००४ मध्ये संजय राठोड जुन्या दारव्हा मतदारसंघातून काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांनी आपली ही विजयी घोडदौड सन २००९ आणि आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवली. या निवडणुकीत तर त्यांनी विदर्भातून पहिल्या व महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवित आमदारकीची हॅट्ट्रिक साधली आहे. संजय राठोड गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार असले तरी या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे सलग दोन वेळा निवडून येऊनही त्यांना विरोधी बाकावरच बसावे लागले होते. मात्र गेली १० वर्ष त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून यवतमाळात आणि विरोधी आमदार म्हणून विधानसभेत गाजविले. शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर त्यांनी गेल्या दहा वर्षात अनेक आक्रमक आंदोलने केली. या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडले होते. आता मात्र सत्तेत सहभागी झाल्याने त्यांची ही आंदोलनाची परंपरा किमान पाच वर्ष तरी खंडित होणार आहे. कारण ते स्वत: राज्यमंत्री असल्याने त्यांना थेट जनतेच्या दरबारातून येऊन सरकारविरोधात भूमिका घेता येणार नाही. मात्र राज्यमंत्रीपद मिळाल्याने आमदार संजय राठोड यांच्याकडून दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघातील नागरिकच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहे. जनतेच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहणारे संजय राठोड हे अपेक्षापूर्ती करतील, असा विश्वास मतदारांना आहे. शेती, शेतकरी आणि ग्रामीण समस्यांची असलेली जाण पाहूनच ना.राठोड यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी दिली गेल्याचे मानले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)