शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

शिवसेनेतर्फे ६०० महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

By admin | Updated: January 23, 2016 02:34 IST

गर्दीतून उठलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या नाऱ्यांनीच युवासेना प्रमुखांच्या भाषणाला भक्कम ‘बॅकअप्’ दिला.

आदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कुटुंबांना मदतयवतमाळ : गर्दीतून उठलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या नाऱ्यांनीच युवासेना प्रमुखांच्या भाषणाला भक्कम ‘बॅकअप्’ दिला. जय महाराष्ट्र म्हणताना जोर असला तरी, या आवाजाला सध्याच धार नाही. कारण अजूनही महाराष्ट्रात दुष्काळ, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांचा फडशा पाडल्यानंतरच आपल्याला खऱ्या अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणता येईल... अशा भावनिक आवाहनाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गर्दीवर गारुड केले. युवकांच्या कलाने राजकारणाचा धागा पकडताना आदित्य ठाकरे म्हणाले, कलेचा वारसा मला पणजोबांपासूनच मिळाला. मीही कधी कधी कविता करतो. ही कलाकारी करताना समाजाचाच विचार असतो. मात्र, माझी कलाकारी काँग्रेससारखी नाही बरं का! अशी कोपरखळीही युवासेना प्रमुखांनी मारली. नुकताच मराठवाड्यात गेलो होतो. तिथे साडेतीन हजार शेतकऱ्यांना शिवसेनेने मदत केली. मदत केली, असे अभिमानाने सांगत असलो तरी ही खरे म्हणजे दु:खाचीच बाब आहे. शेतकऱ्यांना यापुढे कुणाच्याही मदतीची गरजच भासू नये. त्यासाठीच त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या योजना आवश्यक आहेत. मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून २५ कोटींच्या योजना आम्ही आणू शकलो. शासनाकडून २५ कोटींच्या योजना आणण्यासाठी ६५ लाख रुपयांच्या लोकसहभागाची गरज होती. हे पैसे गरीब शेतकरी कसे देणार? म्हणून उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून हे ६५ लाख उभे करण्यात आले. शिवसेनेने केलेली ही मदत नव्हे, ते आमचे कर्तव्यच आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठीही आमचा हाच प्रयत्न आहे. आता शिलाई मशीन दिल्या. त्यांचे प्रशिक्षणही देऊ. नुसते बोलणे हा शिवसेनेचा स्वभाव नाही, तर कर्तव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या योजनांची अंमलबजावणी निट होते की नाही, याकडे प्रसारमाध्यमांनी जरूर लक्ष ठेवावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, कर्तृत्ववान माणसाला कर्तृत्वातूनच आदरांजली दिली पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असा शब्द दिला होता. शिलाई मशीनच्या वाटपातून आम्ही त्या शब्दाला जागत आहोत. शेतीचे अनेक प्रश्न आहेत. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचाच अधिक भाग आहे. निसर्गापुढे आपले फारसे चालत नाही. पण शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी आपण बरेच काही करू शकतो. त्यासाठीच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. पण नुसती पैशांची मदत देऊन भागणार नाही? त्यासाठी प्रत्येक शेतकरी महिलेला स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी आम्हाला बाळासाहेबांनीच स्फूर्ती दिली. त्याला आम्ही कायम जागू. शेतकरी भगिनींनो, कधीही परकेपणा वाटून घेऊ नका. धीराने जगा आणि पुढे जा, असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.खासदार भावना गवळी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सूत्रसंचालन शहरप्रमुख पराग पिंगळे यांच्यासह अमरावतीचे कवी नितीन देशमुख यांनी केले. यावेळी खासदार अनिल देसाई, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुखव्दय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, वाशीमचे जिल्हा प्रमुख राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)