शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

शिवसेनेतर्फे ६०० महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

By admin | Updated: January 23, 2016 02:34 IST

गर्दीतून उठलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या नाऱ्यांनीच युवासेना प्रमुखांच्या भाषणाला भक्कम ‘बॅकअप्’ दिला.

आदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कुटुंबांना मदतयवतमाळ : गर्दीतून उठलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या नाऱ्यांनीच युवासेना प्रमुखांच्या भाषणाला भक्कम ‘बॅकअप्’ दिला. जय महाराष्ट्र म्हणताना जोर असला तरी, या आवाजाला सध्याच धार नाही. कारण अजूनही महाराष्ट्रात दुष्काळ, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांचा फडशा पाडल्यानंतरच आपल्याला खऱ्या अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणता येईल... अशा भावनिक आवाहनाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गर्दीवर गारुड केले. युवकांच्या कलाने राजकारणाचा धागा पकडताना आदित्य ठाकरे म्हणाले, कलेचा वारसा मला पणजोबांपासूनच मिळाला. मीही कधी कधी कविता करतो. ही कलाकारी करताना समाजाचाच विचार असतो. मात्र, माझी कलाकारी काँग्रेससारखी नाही बरं का! अशी कोपरखळीही युवासेना प्रमुखांनी मारली. नुकताच मराठवाड्यात गेलो होतो. तिथे साडेतीन हजार शेतकऱ्यांना शिवसेनेने मदत केली. मदत केली, असे अभिमानाने सांगत असलो तरी ही खरे म्हणजे दु:खाचीच बाब आहे. शेतकऱ्यांना यापुढे कुणाच्याही मदतीची गरजच भासू नये. त्यासाठीच त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या योजना आवश्यक आहेत. मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून २५ कोटींच्या योजना आम्ही आणू शकलो. शासनाकडून २५ कोटींच्या योजना आणण्यासाठी ६५ लाख रुपयांच्या लोकसहभागाची गरज होती. हे पैसे गरीब शेतकरी कसे देणार? म्हणून उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून हे ६५ लाख उभे करण्यात आले. शिवसेनेने केलेली ही मदत नव्हे, ते आमचे कर्तव्यच आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठीही आमचा हाच प्रयत्न आहे. आता शिलाई मशीन दिल्या. त्यांचे प्रशिक्षणही देऊ. नुसते बोलणे हा शिवसेनेचा स्वभाव नाही, तर कर्तव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या योजनांची अंमलबजावणी निट होते की नाही, याकडे प्रसारमाध्यमांनी जरूर लक्ष ठेवावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, कर्तृत्ववान माणसाला कर्तृत्वातूनच आदरांजली दिली पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असा शब्द दिला होता. शिलाई मशीनच्या वाटपातून आम्ही त्या शब्दाला जागत आहोत. शेतीचे अनेक प्रश्न आहेत. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचाच अधिक भाग आहे. निसर्गापुढे आपले फारसे चालत नाही. पण शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी आपण बरेच काही करू शकतो. त्यासाठीच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. पण नुसती पैशांची मदत देऊन भागणार नाही? त्यासाठी प्रत्येक शेतकरी महिलेला स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी आम्हाला बाळासाहेबांनीच स्फूर्ती दिली. त्याला आम्ही कायम जागू. शेतकरी भगिनींनो, कधीही परकेपणा वाटून घेऊ नका. धीराने जगा आणि पुढे जा, असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.खासदार भावना गवळी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सूत्रसंचालन शहरप्रमुख पराग पिंगळे यांच्यासह अमरावतीचे कवी नितीन देशमुख यांनी केले. यावेळी खासदार अनिल देसाई, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुखव्दय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, वाशीमचे जिल्हा प्रमुख राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)