शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

फवारणीपीडित शेतकºयांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:51 IST

फवारणीच्या विषबाधेमुळे जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजूर मृत्युमुखी पडले. शेकडोंना विषबाधा झाली. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.

ठळक मुद्देदिवाकर रावते : भाऊबीज भेट कार्यक्रम, शेतकरी, शेतमजुरांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फवारणीच्या विषबाधेमुळे जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजूर मृत्युमुखी पडले. शेकडोंना विषबाधा झाली. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अनपेक्षित कोसळलेल्या संकटातून या कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतल्याची ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे दिली. शिवसेनेच्यावतीने स्थानिक उत्सव मंगल कार्यालयात, फवारणीत मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबीयांसाठी आयोजित भाऊबीज भेट कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, वाशिमचे जिल्हा प्रमुख राजेश पाटील, सोमेश्वर पुसदकर, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी उपस्थित होते. फवारणीमुळे मृत्युमूखी पडलेल्या जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबांना शिवसेनेतर्फे १० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत, शेतकºयाची पत्नी व आईला साडीचोळी, मुला, मुलींना कपडे, दप्तर, वह्या आणि आवश्यक वस्तुंची किट भेट देण्यात आली.ना. संजय राठोड यांनी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. यवतमाळातील फवारणीपीडित शेतकरी, शेतमजूर कुटुंबीयांना मदत केली. शिवसेना राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देते. शिवसेनेची पहिली बांधिलकी ही शेतकरी आणि सामान्य जनतेशी आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्व कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे. लवकरच या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार रोजगार दिला जाईल, असे ना. राठोड म्हणाले.शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक करून, शिवसेनेला शेतकºयांच्या वेदनेची खरी जाणीव असल्याचे सांगितले.प्रास्ताविक सोमेश्वर पुसदकर यांनी केले. संचालन शहर प्रमुख पराग पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, नगर परिषद अध्यक्ष, नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आदी उपस्थित होते.