शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

शासनाच्या निषेधार्थ मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:41 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथील तिरंगा चौकात सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनात रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात पुसद विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

ठळक मुद्देचक्रीधरणे : तिसऱ्या दिवशी पुसदमधील शेतकऱ्यांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथील तिरंगा चौकात सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनात रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात पुसद विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान, बोंडअळीच्या मदतीचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे गेलाच नसल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आंदोलनस्थळी केला.राज्य विधीमंडळात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार रूपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत सरसकट व विनाविलंब देण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी संघर्ष समिती, काँग्रेस, मनसे, राष्ट्रीय युवा संघटन, शेतकरी संघटना, शेतकरी वारकरी संघटना, बेंबळा कालवे संघर्ष समिती आदींनी चक्री धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण करून सरकारचा निषेध केला.आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी खासदार गवळी यांनी शिवसेना सदैव शेतकरी आणि त्यांच्यासाठी लढणाऱ्यांसोबत असल्याचे सांगितले. सरकारचे धोरण चुकीचे असून लोकसभेत या विरोधात रान उठवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तिसऱ्या दिवशी या आंदोलनात पुसद विधानसभा मतदार संघातील शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असलेल्या फडणवीस सरकारच्या निषेधार्थ मुंडण केले. कीर्तनकार नंदकुमार माळवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना बोलके करणारे कीर्तन सादर केले.या आंदोलनात रविवारी डॉ. वजाहत मिर्झा, डॉ.मो.नदीम, अशोक बोबडे, प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अजय पुरोहित, सुधीर जवादे, माधुरी अराठे, दिनेश गोगरकर, राजेंद्र गायकवाड, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, जक्की अन्वर, किशोर राठोड, मनमोहनसिंग चव्हाण, प्रभाकर उईके, जियाभाई, सुभाष राठोड, पंडितराव देशमुख, बाळू दरणे, नईम इजारदार, गोपाल राठोड, अमजद बिल्डर, नाने खान, शेख चाँद, समीर शेख रमजान, बळीराम चव्हाण, गजानन चव्हाण, तुकाराम हटकर, अब्दुल सलाम अब्दुल सत्तार, उत्तम पवार, जयश्री देसाई, वीणा नागदिवे, ममता मिश्रा, सुनीता पाटील, मनीषा मेसेकर, शुभांगी गलांडे आदी सहभागी होते.मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केलेला मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे नाही - गवळीचक्रीधरणे आंदोलनाला शिवसेनेने पाठींबा देत सरकार विरोधात हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केलेल्या मदतीचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे मंजुरीसाठी आला नसल्याचा गौप्यस्फोट खासदार भावना गवळी यांनी केला. त्यांनी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून भांडू आणि लोकसभेतही कलम १९३ नुसार चर्चेसाठी सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही दिली. केंद्राच्या दुष्काळी मदतीसाठी अद्याप राज्याचा प्रस्ताव नाही. बियाणे कंपन्या न्यायालयात जाणार आहे. अशावेळी सरकारने स्वत:च्या खिशातील पैसे शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.