शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी तालुक्यातील २३ गावांत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

नदी, नाले कोरडे पडले आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. तूर्तास २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींनी टंचाईवर मात करण्यासाठी गावाशेजारी पाणी असणाऱ्या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. आता हे प्रस्ताव तहसीलकडे पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देविहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव : सुधाकरनगरमध्ये टँकरने पुरवठा

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : मे महिना लागताच तापमानात वाढ होत आहे. दिवसेंदिवस पारा चढत आहे. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, बोअर, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटू लागल्या आहे. त्यामुळे तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.तालुक््यात पाणी पातळी खोल जात आहे. नदी, नाले कोरडे पडले आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. तूर्तास २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींनी टंचाईवर मात करण्यासाठी गावाशेजारी पाणी असणाऱ्या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. आता हे प्रस्ताव तहसीलकडे पाठविण्यात आले आहे.तालुक्यातून अरुणावती, पैनगंगा, अडाण या तीन मुख्य नद्या वाहतात. या तिनही नदी पात्रातील पाणी कमी होत आहे. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. कापेश्वर, आमणी, बोरगाव, अंबोडा, तरोडा, धनसिंग हेटी, लोनबेहळ, गणगाव, साखरतांडा, सुधाकरनगर, कोसदणी, शिवर, भंडारी, सावळी-सदोबा, जांब, कुऱ्हा, डुमणी, मुकिंदपूर, भानसरा, वरूड तुका, देऊरवाडी, शिरपूर, कवठाबाजार आदी २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथील ग्रामपंचायतींनी गावाशेजारी पाणी असणाऱ्या खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. यापैकी कापेश्वर, आमणी, बोरगाव दा., अंबोडा, तरोडा आदी १९ गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झाले आहे.तालुक्यातील पाळोदी, सुधाकरनगर या दोन गावांत तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायतीने गावात टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. यातील सुधाकरनगर येथे १८ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.७५ लाखांचा कृती आराखडातालुक्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. त्यामुळे यंदा तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचायत समितीने पाणीटंचाई उपाययोजनांसाठी ७४ लाख ७६ हजारांचा कृती आराखडा तयार केल्याची माहिती गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिली. दरम्यान, ११ गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई