शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सात तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:03 IST

जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली.

ठळक मुद्दे३ हजार ७८५ घरांची पडझड : २२ हजार हेक्टरवर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली. तर ग्रामीण भागातील रस्ते, पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय विद्युत खांबही कोसळले आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच प्रशासनाला रस्ते दुरुस्तीची कामेही त्वरेने हाती घ्यावी लागणार आहेत.केवळ तीन दिवसात जिल्ह्यात ९९.७३ मिलीमीटर पाऊस पडला. पावसाचे हे प्रमाण मासिक सरासरीच्या दीडशे टक्के इतके अधिक आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात सर्वाधिक हानी झाली असून येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नुकसानीचे युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. पाहणीसाठी प्रत्येक तालुक्यात महसूल, कृषी आणि पंचायत विभागाची चमू तयार करण्यात आली. त्या माध्यमातून संयुक्त पंचनामे सुरू आहेत.तालुक्यात नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतशिवारातील पीक पाण्याखाली आले. नदीकाठचे पीक वाहून गेले. केळापूर तालुक्यात ३५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुसद तालुक्यात ७९४ हेक्टर, घाटंजी तालुक्यात दोन हजार हेक्टरचे नुकसान झाले. दारव्हा तालुक्यात १३९ हेक्टरचे नुकसान झाले. महागाव तालुक्यात नऊ हजार ५६२ हेक्टरचे नुकसान झाले. उमरखेडमध्ये सात हजार ८११ हेक्टरचे नुकसान झाले. तर झरीमध्ये दोन हजार हेक्टरवर नुकसानीची नोंद करण्यात आली.सततच्या पावसाने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामध्ये ३ हजार ७८५ घरांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. ग्रामीण भागातील सर्वेक्षण अद्यापही सुरू आहे. यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेडमध्ये १००, महागाव २५१, दिग्रस ६००, केळापूर २७, पुसद ८४, यवतमाळ ३१, घाटंजी २६, कळंब ४, आर्णी १२७६, दारव्हा तालुक्यात १३८६ घरांची पडझड झाली. उमरखेडमध्ये ४०० घरांना पुराचा धोका निर्माण झाल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शासकीय इमारती आणि रस्त्यांना पावसाचा मोठा फटका बसला. आता सार्वजनिक बांधकाम विभागापुढे दुरुस्तीचे आव्हान आहे. पावसादरम्यान विद्युत खांब आडवे पडले.जिल्ह्यातील जलसाठ्यात समाधानकारक वाढचार प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’मोठा पूस, नवरगाव, सायखेडा आणि बोरगाव हे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. अरूणावती प्रकल्पात २४ तासात ३२ टक्क्यावरून ७५ टक्के जलसाठा निर्माण झाला. बेंबळामध्ये ४९, अडाण ८९, गोकी ५९, वाघाडी ६१, तर अधरपूस प्रकल्पात ८० टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सात मध्यम व ९२ लघु अशा १०१ प्रकल्पांमध्ये ६६.४२ टक्के जलसाठा साचला आहे.सरासरीच्या ६७ टक्के पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. आर्णी तालुक्यात ९४ टक्के पाऊस झाला आहे. कळंब आणि राळेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.२० लाखांची तात्काळ मदतछावण्यांमध्ये आश्रयाला असणाऱ्या कुटुंबीयांना २० लाख रूपयांची मदत तात्काळ वितरित करण्यात आली. आरोग्य विभागाच्या यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर