शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सहस्त्रकुंड धबधब्यात अडकले दोन महिलांसह सात जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:57 IST

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली.

ठळक मुद्देतीन तास अनुभवला थरार : पोलीस आणि नागरिकांनी काढले सुखरूप बाहेर, मुरली बंधाºयाचे पाणी सोडल्याचा परिणाम

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली. पोलीस आणि नागरिकांच्या प्रयत्नाने सातही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वेळ आली होती परंतु दैव बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले. या थरारक घटनेने उपस्थित पर्यटकांच्या अंगावरही काटा आला होता.विदर्भ, मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. या धबधब्याच्या वरच्या बाजुला यंदा पाणी कमी असल्याने अनेकांची ये-जा सुरू असते. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मराठवाड्याच्या इसलापूर भागातून सात जण नदी पार करीत होते. परंतु त्याच वेळेस अचानक मुरली बंधाºयाचे पाणी सोडले. पाण्याची पातळी वाढली. हा प्रकार लक्षात येताच दोन महिलांसह सातही जणांनी एका मोठ्या खडकाचा आधार घेतला. मागच्या बाजुला धो-धो करत प्रचंड आवाजाचा धबधबा आणि समोरून पैनगंगेचे वाढते पाणी. अशा परिस्थितीत हे सातही जण अडकले. आता मृत्यू अटळ आहे, असे त्यांना वाटू लागले. हा प्रकार दोन्ही बाजुचे पर्यटक पाहात होते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही युवकांनी थेट मुरलीचा बंधारा गाठला. बंधाºयाचे गेट बंद केले. या सात जणांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. एका दोरीच्या सहाय्याने सातही जणांना एका पाठोपाठ एक तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. कांताबाई नामदेव चव्हाण (५०), तोतीबाई राठोड (४०) दोघीही रा. बोधडी ता. किनवट, रवी राम राठोड (३०) रा. चिंचोली ता. उमरखेड, संदीप ग्यानबा नरवाडे रा. महागाव, गोपी जाधव (३५) रा. मुरली ता. उमरखेड, जनार्दन गायकवाड (३०) रा. धानोरा ता. किनवट, श्यामराव राठोड (७०) रा. राजगड ता. किनवट यांचा समावेश होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी बिटरगावचे ठाणेदार रंगनाथ जगताप, उपनिरीक्षक रमेश खंदारे, विक्रम बोने यांच्यासह स्थानिक तरुण नितीन जाधव, अरविंद चव्हाण, अनिल राठोड, नामदेव राठोड, तुकाराम राठोड, हनुमान जयस्वाल, वसंता राठोड यांनी सहकार्य केले.मृत्यूच्या दारातून परतलेसहस्त्रकुंड धबधब्याचा प्रचंड आवाज येतो. या धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या खडावरच हे सात जण अडकले होते. उघड्या डोळ््यांनी मृत्यू दिसत होता. त्यातच पैनगंगेचे पाणीही वाढत होते. परंतु दैव बलवत्तर म्हणून वेळीच मदत मिळाली आणि सातही जण मृत्यूच्या दाढेतून परत आले.