शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सहस्त्रकुंड धबधब्यात अडकले दोन महिलांसह सात जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:57 IST

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली.

ठळक मुद्देतीन तास अनुभवला थरार : पोलीस आणि नागरिकांनी काढले सुखरूप बाहेर, मुरली बंधाºयाचे पाणी सोडल्याचा परिणाम

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली. पोलीस आणि नागरिकांच्या प्रयत्नाने सातही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वेळ आली होती परंतु दैव बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले. या थरारक घटनेने उपस्थित पर्यटकांच्या अंगावरही काटा आला होता.विदर्भ, मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. या धबधब्याच्या वरच्या बाजुला यंदा पाणी कमी असल्याने अनेकांची ये-जा सुरू असते. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मराठवाड्याच्या इसलापूर भागातून सात जण नदी पार करीत होते. परंतु त्याच वेळेस अचानक मुरली बंधाºयाचे पाणी सोडले. पाण्याची पातळी वाढली. हा प्रकार लक्षात येताच दोन महिलांसह सातही जणांनी एका मोठ्या खडकाचा आधार घेतला. मागच्या बाजुला धो-धो करत प्रचंड आवाजाचा धबधबा आणि समोरून पैनगंगेचे वाढते पाणी. अशा परिस्थितीत हे सातही जण अडकले. आता मृत्यू अटळ आहे, असे त्यांना वाटू लागले. हा प्रकार दोन्ही बाजुचे पर्यटक पाहात होते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही युवकांनी थेट मुरलीचा बंधारा गाठला. बंधाºयाचे गेट बंद केले. या सात जणांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. एका दोरीच्या सहाय्याने सातही जणांना एका पाठोपाठ एक तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. कांताबाई नामदेव चव्हाण (५०), तोतीबाई राठोड (४०) दोघीही रा. बोधडी ता. किनवट, रवी राम राठोड (३०) रा. चिंचोली ता. उमरखेड, संदीप ग्यानबा नरवाडे रा. महागाव, गोपी जाधव (३५) रा. मुरली ता. उमरखेड, जनार्दन गायकवाड (३०) रा. धानोरा ता. किनवट, श्यामराव राठोड (७०) रा. राजगड ता. किनवट यांचा समावेश होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी बिटरगावचे ठाणेदार रंगनाथ जगताप, उपनिरीक्षक रमेश खंदारे, विक्रम बोने यांच्यासह स्थानिक तरुण नितीन जाधव, अरविंद चव्हाण, अनिल राठोड, नामदेव राठोड, तुकाराम राठोड, हनुमान जयस्वाल, वसंता राठोड यांनी सहकार्य केले.मृत्यूच्या दारातून परतलेसहस्त्रकुंड धबधब्याचा प्रचंड आवाज येतो. या धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या खडावरच हे सात जण अडकले होते. उघड्या डोळ््यांनी मृत्यू दिसत होता. त्यातच पैनगंगेचे पाणीही वाढत होते. परंतु दैव बलवत्तर म्हणून वेळीच मदत मिळाली आणि सातही जण मृत्यूच्या दाढेतून परत आले.