शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सहस्त्रकुंड धबधब्यात अडकले दोन महिलांसह सात जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:57 IST

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली.

ठळक मुद्देतीन तास अनुभवला थरार : पोलीस आणि नागरिकांनी काढले सुखरूप बाहेर, मुरली बंधाºयाचे पाणी सोडल्याचा परिणाम

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली. पोलीस आणि नागरिकांच्या प्रयत्नाने सातही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वेळ आली होती परंतु दैव बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले. या थरारक घटनेने उपस्थित पर्यटकांच्या अंगावरही काटा आला होता.विदर्भ, मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. या धबधब्याच्या वरच्या बाजुला यंदा पाणी कमी असल्याने अनेकांची ये-जा सुरू असते. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मराठवाड्याच्या इसलापूर भागातून सात जण नदी पार करीत होते. परंतु त्याच वेळेस अचानक मुरली बंधाºयाचे पाणी सोडले. पाण्याची पातळी वाढली. हा प्रकार लक्षात येताच दोन महिलांसह सातही जणांनी एका मोठ्या खडकाचा आधार घेतला. मागच्या बाजुला धो-धो करत प्रचंड आवाजाचा धबधबा आणि समोरून पैनगंगेचे वाढते पाणी. अशा परिस्थितीत हे सातही जण अडकले. आता मृत्यू अटळ आहे, असे त्यांना वाटू लागले. हा प्रकार दोन्ही बाजुचे पर्यटक पाहात होते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही युवकांनी थेट मुरलीचा बंधारा गाठला. बंधाºयाचे गेट बंद केले. या सात जणांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. एका दोरीच्या सहाय्याने सातही जणांना एका पाठोपाठ एक तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. कांताबाई नामदेव चव्हाण (५०), तोतीबाई राठोड (४०) दोघीही रा. बोधडी ता. किनवट, रवी राम राठोड (३०) रा. चिंचोली ता. उमरखेड, संदीप ग्यानबा नरवाडे रा. महागाव, गोपी जाधव (३५) रा. मुरली ता. उमरखेड, जनार्दन गायकवाड (३०) रा. धानोरा ता. किनवट, श्यामराव राठोड (७०) रा. राजगड ता. किनवट यांचा समावेश होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी बिटरगावचे ठाणेदार रंगनाथ जगताप, उपनिरीक्षक रमेश खंदारे, विक्रम बोने यांच्यासह स्थानिक तरुण नितीन जाधव, अरविंद चव्हाण, अनिल राठोड, नामदेव राठोड, तुकाराम राठोड, हनुमान जयस्वाल, वसंता राठोड यांनी सहकार्य केले.मृत्यूच्या दारातून परतलेसहस्त्रकुंड धबधब्याचा प्रचंड आवाज येतो. या धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या खडावरच हे सात जण अडकले होते. उघड्या डोळ््यांनी मृत्यू दिसत होता. त्यातच पैनगंगेचे पाणीही वाढत होते. परंतु दैव बलवत्तर म्हणून वेळीच मदत मिळाली आणि सातही जण मृत्यूच्या दाढेतून परत आले.